शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

बाग वाचविण्यासाठी शेतक-याची अशीही धडपड

By admin | Updated: June 8, 2016 02:13 IST

डाळिंबाच्या झाडाला बांधल्या ४0 हजारांच्या साड्या.

अमोल ठाकरे/संग्रामपूर (जि. बुलडाणा)ग्रामीण भागातील शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळताना दिसत आहे. आपले हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी वरवट बकाल येथील शेतकर्‍याने डाळिंबाच्या झाडांना साड्या बांधून बागेचे संरक्षण करण्याचा एक अनोखा प्रयोग केलेला आहे. त्यामुळे या शेतकर्‍याचा आदर्श फळबाग करणार्‍या शेतकर्‍यांच्या गावागावांत पोहोचत आहे.वरवट बकाल येथील शेतकरी तुळशीराम जगन्नाथ गांधी यांनी आपल्या पाच एकर शेतात पाच वर्षांंपूर्वी डाळिंबाची लागवड केलीे. दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाळा जास्त तापल्याने सर्वसामान्यांसह फळपिकांनासुद्धा याचा फटका बसत होता. यावर एक नामी शक्कल गांधी यांना सुचली. त्यांनी शेतात लागवड केलेल्या १ हजार २00 झाडांना प्रत्येकी दोन याप्रमाणे सुमारे दोन हजार साड्यांनी गुंडाळून घेतले. यासाठी त्यांना ४0 हजार रुपये खर्च करावा लागला. याबाबत त्यांनी सांगितले की, वाढत्या उन्हाचा फटका डाळिंबाच्या बागेत लागलेल्या फळांना बसू नये तसेच पक्ष्यांचा उपद्रव कमी व्हावा या दृष्टीने काही उपाय करता येईल का, याबाबत विचार करीत होतो. नेटशेड खर्चीक पर्याय होता. त्यामुळे सहज करता येणारा उपाय म्हणून झाडांना साड्या गुंडाळल्या. परिणामी कमी खर्चात पिकाचे संरक्षण झाल्याचे त्यांनी सांगितले.पक्ष्यांचा उपद्रव झाला कमीडाळिंबाच्या झाडांना साड्या गुंडाळल्यामुळे उन्हापासून फळांचे व झाडांचे संरक्षण तर होतच आहे, शिवाय ज्या वेळेला शेतातून वारा वाहतो, त्यामुळे या झाडांवरील साड्यांद्वारे एक वेगळाच ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे कुठलाही पक्षी या डाळिंबाच्या बागेकडे फिरकत नाही. पक्ष्यांचा उपद्रव कमी होण्यास मदत झाली आहे आणि त्यामुळे फळांचे नुकसानही टळले आहे.