शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बाग वाचविण्यासाठी शेतक-याची अशीही धडपड

By admin | Updated: June 8, 2016 02:13 IST

डाळिंबाच्या झाडाला बांधल्या ४0 हजारांच्या साड्या.

अमोल ठाकरे/संग्रामपूर (जि. बुलडाणा)ग्रामीण भागातील शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळताना दिसत आहे. आपले हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी वरवट बकाल येथील शेतकर्‍याने डाळिंबाच्या झाडांना साड्या बांधून बागेचे संरक्षण करण्याचा एक अनोखा प्रयोग केलेला आहे. त्यामुळे या शेतकर्‍याचा आदर्श फळबाग करणार्‍या शेतकर्‍यांच्या गावागावांत पोहोचत आहे.वरवट बकाल येथील शेतकरी तुळशीराम जगन्नाथ गांधी यांनी आपल्या पाच एकर शेतात पाच वर्षांंपूर्वी डाळिंबाची लागवड केलीे. दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाळा जास्त तापल्याने सर्वसामान्यांसह फळपिकांनासुद्धा याचा फटका बसत होता. यावर एक नामी शक्कल गांधी यांना सुचली. त्यांनी शेतात लागवड केलेल्या १ हजार २00 झाडांना प्रत्येकी दोन याप्रमाणे सुमारे दोन हजार साड्यांनी गुंडाळून घेतले. यासाठी त्यांना ४0 हजार रुपये खर्च करावा लागला. याबाबत त्यांनी सांगितले की, वाढत्या उन्हाचा फटका डाळिंबाच्या बागेत लागलेल्या फळांना बसू नये तसेच पक्ष्यांचा उपद्रव कमी व्हावा या दृष्टीने काही उपाय करता येईल का, याबाबत विचार करीत होतो. नेटशेड खर्चीक पर्याय होता. त्यामुळे सहज करता येणारा उपाय म्हणून झाडांना साड्या गुंडाळल्या. परिणामी कमी खर्चात पिकाचे संरक्षण झाल्याचे त्यांनी सांगितले.पक्ष्यांचा उपद्रव झाला कमीडाळिंबाच्या झाडांना साड्या गुंडाळल्यामुळे उन्हापासून फळांचे व झाडांचे संरक्षण तर होतच आहे, शिवाय ज्या वेळेला शेतातून वारा वाहतो, त्यामुळे या झाडांवरील साड्यांद्वारे एक वेगळाच ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे कुठलाही पक्षी या डाळिंबाच्या बागेकडे फिरकत नाही. पक्ष्यांचा उपद्रव कमी होण्यास मदत झाली आहे आणि त्यामुळे फळांचे नुकसानही टळले आहे.