शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

बाग वाचविण्यासाठी शेतक-याची अशीही धडपड

By admin | Updated: June 8, 2016 02:13 IST

डाळिंबाच्या झाडाला बांधल्या ४0 हजारांच्या साड्या.

अमोल ठाकरे/संग्रामपूर (जि. बुलडाणा)ग्रामीण भागातील शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळताना दिसत आहे. आपले हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी वरवट बकाल येथील शेतकर्‍याने डाळिंबाच्या झाडांना साड्या बांधून बागेचे संरक्षण करण्याचा एक अनोखा प्रयोग केलेला आहे. त्यामुळे या शेतकर्‍याचा आदर्श फळबाग करणार्‍या शेतकर्‍यांच्या गावागावांत पोहोचत आहे.वरवट बकाल येथील शेतकरी तुळशीराम जगन्नाथ गांधी यांनी आपल्या पाच एकर शेतात पाच वर्षांंपूर्वी डाळिंबाची लागवड केलीे. दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाळा जास्त तापल्याने सर्वसामान्यांसह फळपिकांनासुद्धा याचा फटका बसत होता. यावर एक नामी शक्कल गांधी यांना सुचली. त्यांनी शेतात लागवड केलेल्या १ हजार २00 झाडांना प्रत्येकी दोन याप्रमाणे सुमारे दोन हजार साड्यांनी गुंडाळून घेतले. यासाठी त्यांना ४0 हजार रुपये खर्च करावा लागला. याबाबत त्यांनी सांगितले की, वाढत्या उन्हाचा फटका डाळिंबाच्या बागेत लागलेल्या फळांना बसू नये तसेच पक्ष्यांचा उपद्रव कमी व्हावा या दृष्टीने काही उपाय करता येईल का, याबाबत विचार करीत होतो. नेटशेड खर्चीक पर्याय होता. त्यामुळे सहज करता येणारा उपाय म्हणून झाडांना साड्या गुंडाळल्या. परिणामी कमी खर्चात पिकाचे संरक्षण झाल्याचे त्यांनी सांगितले.पक्ष्यांचा उपद्रव झाला कमीडाळिंबाच्या झाडांना साड्या गुंडाळल्यामुळे उन्हापासून फळांचे व झाडांचे संरक्षण तर होतच आहे, शिवाय ज्या वेळेला शेतातून वारा वाहतो, त्यामुळे या झाडांवरील साड्यांद्वारे एक वेगळाच ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे कुठलाही पक्षी या डाळिंबाच्या बागेकडे फिरकत नाही. पक्ष्यांचा उपद्रव कमी होण्यास मदत झाली आहे आणि त्यामुळे फळांचे नुकसानही टळले आहे.