शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

...अशी चूक पुन्हा घडू नये - मांडवगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:01 IST

भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली.

- अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : काश्मीरमधील बडगाम येथे २७ फे ब्रुवारी रोजी सकाळी भारतीय वायुदलाच्या लढाऊ एमआय-१७ व्ही-५ हेलिकॉप्टरला अपघात होऊन नाशिकच्या डीजीपीनगरमधील सहवैमानिक स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यासह सहा जवानांना वीरमरण आले. देशाच्या संरक्षणासाठी निनादने आपले बलिदान दिले आहे. त्याच्या वीरमरणाचा सरकारने उचित सन्मान करावा आणि भारतीय सैन्याने यंत्रणेतील दोष निवारण क रून यापुढे अशी चूक घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी भावना निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी जम्मूच्या राजौरी सेक्टरच्या दिशेने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याचदिवशी निनाद व त्यांच्या सहकारी जवानांचे लढाऊ हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे वृत्त आले होते; मात्र आता शत्रूचे हेलिकॉप्टर समजून हवाई दलाकडूनच क्षेपणास्त्र या हेलिकॉप्टरच्या दिशेने डागले गेल्याचे चौकशीत पुढे येत आहे. याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाºयावर वायुसेनेने कारवाईदेखील केल्याचे समजते.

देशाचा सैनिक सहजासहजी घडत नसतो. स्क्वॉड्रन लीडर या पदावरील अधिकारी घडविण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यासाठी कठोर परिश्रम वायुदलाला घ्यावे लागतात. त्यामुळे निनादच्या रूपाने आमच्या कुटुंबासह देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली. निनाद यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले, त्याच्या दुसºया दिवशी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घरी पुन्हा भेट देऊन निनाद यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी माहिती दिली होती, असे मांडवगणे यांनी सांगितले. वायुसेना एक कुटुंबाप्रमाणे असून, मुलगा गमावल्याचे जसे दु:ख आम्हाला आहे, तसे भारतीय वायुसेनेलाही उत्तम वैमानिक गमावल्याचे दु:ख असल्याचे मांडवगणे म्हणाले.यंत्रणेचा समन्वय चुकलायंत्रणेमध्ये योग्य समन्वय घडून आला नाही आणि बॉम्बगोळा डागला गेला, अशी चुकीची पुनरावृत्ती यापुढे कधीही होता कामा नये, जेणेकरून विनाकारण शूरवीरांना वीरमरण येणार नाही, असे मत मांडवगणे यांनी व्यक्त केले. शहीद निनाद व त्यांचे सहकारी दोन मिशन पूर्ण करून तिसºया मिशनवर होते. मात्र याचवेळी यंत्रणेमधील समन्वयाच्या अभावाने त्यांना वीरमरण आले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल