शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

...अशी चूक पुन्हा घडू नये - मांडवगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:01 IST

भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली.

- अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : काश्मीरमधील बडगाम येथे २७ फे ब्रुवारी रोजी सकाळी भारतीय वायुदलाच्या लढाऊ एमआय-१७ व्ही-५ हेलिकॉप्टरला अपघात होऊन नाशिकच्या डीजीपीनगरमधील सहवैमानिक स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यासह सहा जवानांना वीरमरण आले. देशाच्या संरक्षणासाठी निनादने आपले बलिदान दिले आहे. त्याच्या वीरमरणाचा सरकारने उचित सन्मान करावा आणि भारतीय सैन्याने यंत्रणेतील दोष निवारण क रून यापुढे अशी चूक घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी भावना निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी जम्मूच्या राजौरी सेक्टरच्या दिशेने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याचदिवशी निनाद व त्यांच्या सहकारी जवानांचे लढाऊ हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे वृत्त आले होते; मात्र आता शत्रूचे हेलिकॉप्टर समजून हवाई दलाकडूनच क्षेपणास्त्र या हेलिकॉप्टरच्या दिशेने डागले गेल्याचे चौकशीत पुढे येत आहे. याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाºयावर वायुसेनेने कारवाईदेखील केल्याचे समजते.

देशाचा सैनिक सहजासहजी घडत नसतो. स्क्वॉड्रन लीडर या पदावरील अधिकारी घडविण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यासाठी कठोर परिश्रम वायुदलाला घ्यावे लागतात. त्यामुळे निनादच्या रूपाने आमच्या कुटुंबासह देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली. निनाद यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले, त्याच्या दुसºया दिवशी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घरी पुन्हा भेट देऊन निनाद यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी माहिती दिली होती, असे मांडवगणे यांनी सांगितले. वायुसेना एक कुटुंबाप्रमाणे असून, मुलगा गमावल्याचे जसे दु:ख आम्हाला आहे, तसे भारतीय वायुसेनेलाही उत्तम वैमानिक गमावल्याचे दु:ख असल्याचे मांडवगणे म्हणाले.यंत्रणेचा समन्वय चुकलायंत्रणेमध्ये योग्य समन्वय घडून आला नाही आणि बॉम्बगोळा डागला गेला, अशी चुकीची पुनरावृत्ती यापुढे कधीही होता कामा नये, जेणेकरून विनाकारण शूरवीरांना वीरमरण येणार नाही, असे मत मांडवगणे यांनी व्यक्त केले. शहीद निनाद व त्यांचे सहकारी दोन मिशन पूर्ण करून तिसºया मिशनवर होते. मात्र याचवेळी यंत्रणेमधील समन्वयाच्या अभावाने त्यांना वीरमरण आले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल