शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानरचनावादाचा यशस्वी उतारा

By admin | Updated: July 9, 2017 00:35 IST

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील त्यांच्याच वजनाएवढे लादलेले दप्तराचे ओझे कमी करण्यावर सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ज्ञानरचनावादाचा उतारा शोधला

सातारा : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील त्यांच्याच वजनाएवढे लादलेले दप्तराचे ओझे कमी करण्यावर सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ज्ञानरचनावादाचा उतारा शोधला आहे. कृतीयुक्त शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे निम्मे वजन कमी झाले आहे.ज्ञानरचनावादामध्ये पुस्तकी अभ्यासापेक्षा कृतीयुक्त शिक्षणावर भर दिला आहे. मुले स्वत: कृती, गतीने शिकतात. अनेक शाळांनी त्यासाठी शाळांची रंगरंगोटी केली आहे. फरशीवर वर्तुळ, चौकोन, आयत कायमस्वरूपी आखले आहेत. परिसरातील काड्या, गोट्या, दगडगोटे, तक्ते, पट्ट्यांचा वापर करून गणित, भूमिती शिकविले जाते. तसेच ध्वनिचित्रफितीतून विज्ञान शिकविले जाते. भूगोल विषयातही विद्यार्थ्यांना परिसरातील नदी, डोंगर, शेतात नेऊन अनुभवातून शिकवले जाते. गावातून फेरफटका मारून नकाशा तयार करणे व वाचन शिकविले जाते. त्यामुळे त्यांना भाषिक विषय वगळता अन्य विषयांची पुस्तके शाळेत आणण्याची गरजच भासत नाही. ज्ञानरचनावादात शैक्षणिक साहित्य शिक्षकच बनवत असून, ते वर्गातच ठेवले जात असल्याने केवळ वह्याच शाळेत घेऊन जावे लागते. काही शाळांमध्ये शासनातर्फे वॉटर फिल्टर मिळालेला आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटलीचे वजन दप्तरातून कमी झाले आहे.बदलते शिक्षण धोरण, दप्तराच्या ओझ्यावरील उपाययोजना बऱ्याचदा आपण शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांना लेखी स्वरूपात पाठवल्या आहेत़ याबाबत शासनच उदासीन आहे़ दररोजच्या ६ तासिकांपैकी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ज्या तीन तासिका घेतल्या जातात त्याच तासिका दुसऱ्या सत्रात घ्याव्यात़ उर्वरित विषयाच्या तीन तासिका दुसऱ्या दिवशी आणि पुन्हा दुसऱ्या सत्रात घेतल्यास दप्तराचे ओझे निम्मे कमी होणार आहे़ तसे पाहता प्रत्येक शिक्षकाला हजेरी घेण्यात, सूचना करण्यातच पहिली २० मिनिटे जातात़ केवळ १५ मिनिटांत शिक्षक अभ्यासक्रम किती शिकवणार?- ए़डी़ जोशीशिक्षणतज्ज्ञ, सोलापूर केवळ भाषिक पुस्तके वर्गात आणावी लागतात. हे टाळण्यासाठी उपाय शोधला आहे. जुनी पुस्तके विद्यार्थ्यांना वर्गातच ठेवायला दिली जातात. एकही पुस्तक वर्गात आणण्याची गरज नाही. तसेच दोन विषयांसाठी एक वही, गृहपाठासाठी पन्नास पानी वही करण्यास सांगितले जाते.- रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी, कऱ्हाड