शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

ज्ञानरचनावादाचा यशस्वी उतारा

By admin | Updated: July 9, 2017 00:35 IST

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील त्यांच्याच वजनाएवढे लादलेले दप्तराचे ओझे कमी करण्यावर सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ज्ञानरचनावादाचा उतारा शोधला

सातारा : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील त्यांच्याच वजनाएवढे लादलेले दप्तराचे ओझे कमी करण्यावर सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ज्ञानरचनावादाचा उतारा शोधला आहे. कृतीयुक्त शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे निम्मे वजन कमी झाले आहे.ज्ञानरचनावादामध्ये पुस्तकी अभ्यासापेक्षा कृतीयुक्त शिक्षणावर भर दिला आहे. मुले स्वत: कृती, गतीने शिकतात. अनेक शाळांनी त्यासाठी शाळांची रंगरंगोटी केली आहे. फरशीवर वर्तुळ, चौकोन, आयत कायमस्वरूपी आखले आहेत. परिसरातील काड्या, गोट्या, दगडगोटे, तक्ते, पट्ट्यांचा वापर करून गणित, भूमिती शिकविले जाते. तसेच ध्वनिचित्रफितीतून विज्ञान शिकविले जाते. भूगोल विषयातही विद्यार्थ्यांना परिसरातील नदी, डोंगर, शेतात नेऊन अनुभवातून शिकवले जाते. गावातून फेरफटका मारून नकाशा तयार करणे व वाचन शिकविले जाते. त्यामुळे त्यांना भाषिक विषय वगळता अन्य विषयांची पुस्तके शाळेत आणण्याची गरजच भासत नाही. ज्ञानरचनावादात शैक्षणिक साहित्य शिक्षकच बनवत असून, ते वर्गातच ठेवले जात असल्याने केवळ वह्याच शाळेत घेऊन जावे लागते. काही शाळांमध्ये शासनातर्फे वॉटर फिल्टर मिळालेला आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटलीचे वजन दप्तरातून कमी झाले आहे.बदलते शिक्षण धोरण, दप्तराच्या ओझ्यावरील उपाययोजना बऱ्याचदा आपण शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांना लेखी स्वरूपात पाठवल्या आहेत़ याबाबत शासनच उदासीन आहे़ दररोजच्या ६ तासिकांपैकी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ज्या तीन तासिका घेतल्या जातात त्याच तासिका दुसऱ्या सत्रात घ्याव्यात़ उर्वरित विषयाच्या तीन तासिका दुसऱ्या दिवशी आणि पुन्हा दुसऱ्या सत्रात घेतल्यास दप्तराचे ओझे निम्मे कमी होणार आहे़ तसे पाहता प्रत्येक शिक्षकाला हजेरी घेण्यात, सूचना करण्यातच पहिली २० मिनिटे जातात़ केवळ १५ मिनिटांत शिक्षक अभ्यासक्रम किती शिकवणार?- ए़डी़ जोशीशिक्षणतज्ज्ञ, सोलापूर केवळ भाषिक पुस्तके वर्गात आणावी लागतात. हे टाळण्यासाठी उपाय शोधला आहे. जुनी पुस्तके विद्यार्थ्यांना वर्गातच ठेवायला दिली जातात. एकही पुस्तक वर्गात आणण्याची गरज नाही. तसेच दोन विषयांसाठी एक वही, गृहपाठासाठी पन्नास पानी वही करण्यास सांगितले जाते.- रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी, कऱ्हाड