शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मल्लखांबामुळेच अ‍ॅथलेटिक्समध्ये यश

By admin | Updated: June 28, 2016 03:21 IST

‘‘सुमारे २५ वर्षांपूर्वी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत पूरलेल्या मल्लखांबावर प्रात्यक्षिके केली होती.

मुंबई : ‘‘सुमारे २५ वर्षांपूर्वी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत पूरलेल्या मल्लखांबावर प्रात्यक्षिके केली होती. मल्लखांबाच्या सरावामुळेच अ‍ॅथलेटीक्स मध्ये मी यशस्वी होऊ शकले,’’ असे मत आंतरराष्ट्रीय साताऱ्याची अ‍ॅथलिट - प्रशिक्षक आणि माजी मल्लखांबपटू स्नेहलता राजपूत यांनी व्यक्त केले. दादर येथील पावसाळी मल्लखांब शिबीर समारोप कार्यक्रमात राजपूत बोलत होत्या. दादर, शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरात ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबीराचा समारोप समारंभ पार पडला. यावेळी अदिती व्होरा, अनघा चव्हाण, प्रणय जळगावकर आणि केतुक पटेल यांना ‘उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे सागर राणे आणि तेजल मुसळे यांना उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडा समालोचक अरुण वागळे, निकेतन वैदिक पाठशाळेचे प्रभाकर पवार उपस्थितीत होते. शालांत परीक्षेत ९८.४ टक्के गुण मिळवणाऱ्या समर्थच्या राष्ट्रीय मल्लखांबपटूने मल्लखांबाला पर्याय नाही ही कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. शिबिरात ५ ते ८५ वयोगटांतील सुमारे ३५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी दादर येथील कमला मेहता अंध शाळेच्या विद्यार्थीनींनी दोरीवरील मल्लखांबाचे चित्तथराराक प्रात्यक्षिके सादर केली. तसेच समर्थच्या मल्लखांबपटूंनीही दिप रोप, हत्यारी मल्लखांब, बाटल्यांवरील मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिके सादर केली. (क्रीडा प्रतिनिधी)>सकारात्मक विचार करावा...इतर खेळाच्या प्रशिक्षक, संघटनांनी केवळ क्रिकेटचा नाव ठेवू नये, तर क्रिकेटसारखी लोकप्रियता मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करुन त्यानुसार पावले उचलावी. शिवाय आपल्या खेळाचा प्रसार करताना आपण कोठे कमी पडत आहोत, हे जाणून घेत त्याचा सकारात्मक पद्धतीने विचार करावा, असे परखड मत मिलिंद वागळे यांनी व्यक्त केले.