शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आत्मसमर्पितांना हक्काचा निवारा

By admin | Updated: October 19, 2015 02:42 IST

गृह विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मागील १० वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी १०१ जणांना जागा उपलब्ध करून देत

दिगांबर जवादे,  गडचिरोलीगृह विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मागील १० वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी १०१ जणांना जागा उपलब्ध करून देत, घर बांधण्यासाठी मदतही करण्यात आली आहे.नक्षलवादी चळवळीमध्ये जाणारे बहुतेक तरुण गरीब आहेत. नक्षलवाद्यांनी दिशाभूल करून त्यांना चळवळीमध्ये सामील करून घेतले. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने २००५पासून नक्षल आत्मसमर्पण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत संबंधित नक्षलवाद्यांवर असलेले सर्व जुने गुन्हे माफ करून त्यांच्या पदाप्रमाणे रोख रक्कमसुद्धा दिली जाते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येते, ही बाब लक्षात आल्यानंतर आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढत चालले आहे. आत्मसमर्पण करणारी व्यक्ती पुन्हा आपल्या दुर्गम भागातील गावाकडे गेल्यास त्याच्या जीविताला नक्षलवाद्यांकडून धोका निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता राहते. त्यामुळे योजनेअंतर्गत पैसा मिळाला तरी राहण्याची फार मोठी समस्या निर्माण होते. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी गडचिरोली शहराच्या जवळपास राहण्याची इच्छा पोलीस विभागाकडे वर्तविल्यानंतर पोलीस विभाग तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून संबंधित व्यक्तींसाठी जागा उपलब्ध करून देते. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १०१ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना घरांचे पट्टे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून शासनाने आपल्याला नवजीवन मिळवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया काही आत्मसमर्पित नक्षल्यांनी बोलूनही दाखविली आहे.