शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

आत्मसमर्पितांना हक्काचा निवारा

By admin | Updated: October 19, 2015 02:42 IST

गृह विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मागील १० वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी १०१ जणांना जागा उपलब्ध करून देत

दिगांबर जवादे,  गडचिरोलीगृह विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मागील १० वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी १०१ जणांना जागा उपलब्ध करून देत, घर बांधण्यासाठी मदतही करण्यात आली आहे.नक्षलवादी चळवळीमध्ये जाणारे बहुतेक तरुण गरीब आहेत. नक्षलवाद्यांनी दिशाभूल करून त्यांना चळवळीमध्ये सामील करून घेतले. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने २००५पासून नक्षल आत्मसमर्पण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत संबंधित नक्षलवाद्यांवर असलेले सर्व जुने गुन्हे माफ करून त्यांच्या पदाप्रमाणे रोख रक्कमसुद्धा दिली जाते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येते, ही बाब लक्षात आल्यानंतर आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढत चालले आहे. आत्मसमर्पण करणारी व्यक्ती पुन्हा आपल्या दुर्गम भागातील गावाकडे गेल्यास त्याच्या जीविताला नक्षलवाद्यांकडून धोका निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता राहते. त्यामुळे योजनेअंतर्गत पैसा मिळाला तरी राहण्याची फार मोठी समस्या निर्माण होते. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी गडचिरोली शहराच्या जवळपास राहण्याची इच्छा पोलीस विभागाकडे वर्तविल्यानंतर पोलीस विभाग तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून संबंधित व्यक्तींसाठी जागा उपलब्ध करून देते. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १०१ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना घरांचे पट्टे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून शासनाने आपल्याला नवजीवन मिळवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया काही आत्मसमर्पित नक्षल्यांनी बोलूनही दाखविली आहे.