शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

भुयारी मेट्रो ३चे काम पावसाळ्यानंतर

By admin | Updated: July 21, 2016 05:31 IST

काळबादेवी आणि गिरगाव स्थानकामुळे बाधित होणारे प्रकल्पग्रस्त वगळता मेट्रो ३ मुळे जवळपास दोन हजार कुटूंबे बाधित होणार आहेत.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ प्रकल्पातील काळबादेवी आणि गिरगाव स्थानकामुळे बाधित होणारे प्रकल्पग्रस्त वगळता मेट्रो ३ मुळे जवळपास दोन हजार कुटूंबे बाधित होणार आहेत. गिरगाव आणि काळबादेवी स्थानकांमुळे बाधित होणाऱ्यांसाठी ते राहत असणाऱ्या परिसरातच त्यांचे पुनर्वसन करण्यासंबंधीची योजना आखण्यात आली आहे. ही योजना शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो ३ चे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मुख्यालयात बुधवारी आयोजित कार्यक्रमात अश्विनी भिडे यांच्या हस्ते मेट्रो ३ विषयीचे ‘मेट्रोक्युब’ हे न्युजलेटर प्रकाशित करण्यात आले आणि लघुपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.मेट्रो ३ प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील स्थानकामुळे बाधित होणाऱ्या १४८ कुटुंबांचे कुर्ला येथील १२ मजली इमारतीत पुनर्वसन करण्यात आले आहे. पोलीस वसाहतीमधील पोलीस कर्मचाऱ्यांचे चकाला येथे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदनिका वाटप प्रक्रिया पारदर्शक व्हावी, म्हणून प्राधिकरणाने संगणीकृत यंत्रणेचा अवलंब केला होता. सदनिका वाटप पत्रात बारकोड आहे. व्यक्तीचे छायाचित्र, डिजिटल स्वाक्षरीचाही समावेश होता, असेही अश्विनी भिडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा ३३.५ किलोमीटर लांबीचा मार्ग २६ भुयारी आणि एका जमिनीवरील स्थानकाद्वारे जोडला जाईल.मेट्रो ३ चा मार्ग संपूर्णत: भुयारी असून, या मार्गावरील स्थानकांकरिता प्रवेश-निकास आणि इतर सुविधांकरिता जमिनीची गरज आहे.कास्टिंग यार्ड, चिखल माती संकलन, बांधकामांसंबंधी कामे करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जमिनीची गरज भासणार आहे. मेट्रो ३ साठी एकूण ७८.६७ हेक्टर जमिनीची गरज आहे.७५.२२ हेक्टर सरकारी आणि ३.४५ हेक्टर खासगी जमीन संपादित करावी लागणार आहे. ७५.२२ हेक्टरपैकी ६४ हेक्टर संपादित करण्यात आले आहेत.खासगी जमिनीच्या संपादनाकरिता ६६ सामंजस्य करार करावे लागणार आहेत. आतापर्यंत ७ सामंजस्य करार करण्यात आले आहेत.