शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

महापालिकेच्या उत्पन्नात १५३ कोटींची भरीव वाढ

By admin | Updated: November 4, 2016 03:21 IST

मागील दोन वर्षे उत्पन्नआणि खर्चाच्या कात्रीत सापडलेला पालिकेचा गाडा आता खऱ्या अर्थाने रुळावर आला

ठाणे : मागील दोन वर्षे उत्पन्नआणि खर्चाच्या कात्रीत सापडलेला पालिकेचा गाडा आता खऱ्या अर्थाने रुळावर आला असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आखलेल्या विविध योजनांमुळे पालिकेचे उत्पन्न हे मागील वर्षीच्या तुलनेत १५३ कोटींनी अधिक वाढले आहे. त्यातही खास बाब म्हणजे महासभेने जे उत्पन्न अपेक्षित धरले होते, त्याची ५० टक्यापर्यंत पालिकेच्या विविध विभागांनी मारली आहे. त्यातही पाणीपुरवठा विभागाने तर चक्क मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ११२.३८ टक्के अधिक वसुली केली आहे. ठाणे महापालिकेत एलबीटी लागू झाल्यानंतर उत्पन्न कमी होऊन अनेक कामे प्रलंबित होती. पालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबरच ठेकेदारांची बिले निघतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, आयुक्तांनी उत्पन्न वाढीसाठी प्रत्येक विभागाला टार्गेट ठरवून दिल्याने आणि थकबाकीची वसुली कशा पद्धतीने करता येऊ शकते,यासाठी विविध योजना हाती घेतल्याने मागील वर्षी प्रमाणेच यंदादेखील उत्पन्नात वाढ झाली आहे. दरम्यान मागील वर्षी ३१ आॅक्टोबर २०१५ पर्यंत पालिकेचे विविध स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न हे ८१५.९० कोटी एवढे होते. तेच या वर्षी ३१ आॅक्टोबर पर्यंत ९६८.९९ कोटी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ १५३.०९ कोटी एवढी आहे. विशेष म्हणजे मागील कित्येक वर्षे पिछाडीवर असलेल्या पाणीपुरवठा विभागाने यंदा वसुलीत गरुडझेप घेतली आहे. मागील वर्षी या विभागाने १.३० कोटींची वसुली केली होती. ती यंदा ३१ आॅक्टोबर पर्यंत १४.९८ कोटी एवढी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती १३.६८ कोटी म्हणजेच तब्बल ११२.३८ टक्के अधिक आहे. यंदा प्रथमच ७.३७ कोटी रुपये हे पाणीपुरवठा सेस म्हणून पालिकेला प्राप्त झाले आहेत. तर त्या खोलाखाल समाज विकास विभागानेही १०८.३३ टक्के जास्त प्राप्त केले आहेत. शिक्षण विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १०५.३६ टक्के अधिक उत्पन्न प्राप्त केले आहे. मालमत्ताकर विभागाने यंदा ४५.२३ टक्के अधिक वसुली केली आहे. मागील वर्षी १६०.३० कोटींचे उत्पन्न प्राप्त करणाऱ्या या विभागाने यंदा २०६.२४ कोटींची वसुली केली आहे. परंतु, दुसरीकडे एलबीटी पोटी पालिकेला यंदा केवळ ३१ आॅक्टोबरपर्यंत ३७९.१८ कोटी प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी ३७३.२२ मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ५४.१७ टक्के एवढी अधिक आहे. शहर विकास विभागानेही४८.२९ टक्के अधिक उत्पन्न मिळविले असून, अग्निशमन दलाने पिछाडीवर मात करून आघाडी घेतली आहे. या विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४१.५५ टक्के अधिक मिळविले आहेत. (प्रतिनिधी)मागील वर्षाचे उत्पन्न ८१५ कोटीमागील वर्षी ३१ आॅक्टोबर २०१५ पर्यंत पालिकेचे विविध स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न हे ८१५.९० कोटी एवढे होते. तेच या वर्षी ३१ आॅक्टोबरपर्यंत ९६८.९९ कोटी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ १५३.०९ कोटी एवढी आहे.