शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाणी अडवा पाणी जिरवा

By admin | Updated: June 19, 2016 01:46 IST

जर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात

- सत्यजीत भटकळजर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात पावसाचे पाणी जमा होत राहील. हे समजवण्यासाठी खेळ आणि नाटक या माध्यमांचा पुरेपूर वापर करण्यात आला. ज्यामुळे कंटाळवाणी भाषणे झाली नाहीत आणि अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात प्रशिक्षण पार पडले.शिबिरादरम्यान या पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात, याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना हडळफच्या माध्यमातून देण्यात आले.पाणी अडवा पाणी जिरवा किंवा माती अडवा पाणी जिरवा या घोषणा बऱ्याच जुन्या आहेत. मग प्रश्न असा उद्भवतो की या घोषणांवर अंमलबजावणी का झाली नाही. पाणी अडवून का जिरवले गेले नाही? एक प्रमुख कारण आहे ते हे की पाणी अडवण्यासाठी, जिरवण्यासाठी गावात एकी होणे खूप गरजेचे आहे.नेहमीच आपण पाणी जिरवण्याऐवजी एकमेकांना जिरवण्यात अधिक रस घेतला. आपण एकमेकांना पाण्यात पाहत राहिलो आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही निवळ घोषणा म्हणून राहिली. ही परिस्थिती बदलावी, गावात एकी निर्माण होऊन पाणलोट विकासाचे कामे व्हावे यासाठी सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा आधार होता प्रशिक्षण. भाग घेणाऱ्या प्रत्येक गावाला ५ ग्रामस्थ प्रशिक्षणाला पाठविणे बंधनकारक होते. प्रशिक्षणाचे दोन प्रमुख भाग होते. पहिला भाग होता तो तांत्रिक प्रशिक्षणाचा - ज्यात पाणलोट विकासाचे विज्ञान शिकवण्यात आले. पाणी अडवा नि जिरवा सांगणे सोपे आहे परंतु ते नेमके कसे करावे याचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. WOTR नावाची संस्था या क्षेत्रात तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून काम करीत आहे. WOTR च्या इंजिनीअर्सनी ही जबाबदारी सांभाळली.हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल होते. त्यात लेक्चरबाजी अजिबात नव्हती. निरीक्षणातून, कृतीतूनच शिकायचे होते. प्रशिक्षणासाठी आम्ही अशा गावांची निवड केली होती जिथे पाऊस अत्यंत कमी पडला होता तरी ती गावे पाण्याच्या बाबतीत समृद्ध होती. कारण त्या गावांनी पाणलोट विकासाची कामे वैज्ञानिक पद्धतीने केली होती. पहिल्याच दिवशी प्रशिक्षणार्थी यजमान गावाची शिवार फेरी करीत असत. त्या शिवारफेरीत त्यांना विहिरीतील पाणी दिसे, मे महिन्यात चालणारी शेती दिसे, गावातील समृद्धी दिसे. त्याचबरोबर यजमान गावात झालेले जलसंधारणाचे लहान मोठे उपचारही दिसत असतात. कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे. कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे. मग पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात हे पुढच्या तीन दिवसांत शिकवले जात असे. काही उपचार ते स्वत: शिबिरादरम्यान निर्माण करत असत. तर बाकी उपचार कसे करतात ते फिल्म्स आणि प्रश्नोत्तरामार्फत शिकवले जात असे. प्रशिक्षणाचा एक भाग तांत्रिक होता, तर दुसरा भाग होता सामाजिक. गाव समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्व असे समजावले जात असे. थोडक्यात काय तर ‘माती अडवा पाणी जिरवा’ म्हणजे काय करायचे? एवढेच न सांगता ते कसे करायचे यावर आम्ही सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून भर दिला. जवळजवळ ८०० प्रशिक्षणार्थी आपापल्या गावी गेले. ते प्रशिक्षण काळात जे जे शिकले ते त्यांनी आपापल्या ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाचे प्रचंड काम केले. नियोजनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व कामे ही ग्रामास्थांनीच केली. शेतकरीच इंजिनीअर होता, शेतकरीच श्रमकरी होता. पाऊस येईल तेव्हा मातीही अडेल, पाणीही जिरेल. आणि याचे पूर्ण श्रेय प्रशिक्षित होऊन आलेल्या शेतकऱ्याचेच असेल.

(जून महिन्याचे मानकरी असलेले लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)