शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

पाणी अडवा पाणी जिरवा

By admin | Updated: June 19, 2016 01:46 IST

जर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात

- सत्यजीत भटकळजर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात पावसाचे पाणी जमा होत राहील. हे समजवण्यासाठी खेळ आणि नाटक या माध्यमांचा पुरेपूर वापर करण्यात आला. ज्यामुळे कंटाळवाणी भाषणे झाली नाहीत आणि अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात प्रशिक्षण पार पडले.शिबिरादरम्यान या पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात, याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना हडळफच्या माध्यमातून देण्यात आले.पाणी अडवा पाणी जिरवा किंवा माती अडवा पाणी जिरवा या घोषणा बऱ्याच जुन्या आहेत. मग प्रश्न असा उद्भवतो की या घोषणांवर अंमलबजावणी का झाली नाही. पाणी अडवून का जिरवले गेले नाही? एक प्रमुख कारण आहे ते हे की पाणी अडवण्यासाठी, जिरवण्यासाठी गावात एकी होणे खूप गरजेचे आहे.नेहमीच आपण पाणी जिरवण्याऐवजी एकमेकांना जिरवण्यात अधिक रस घेतला. आपण एकमेकांना पाण्यात पाहत राहिलो आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही निवळ घोषणा म्हणून राहिली. ही परिस्थिती बदलावी, गावात एकी निर्माण होऊन पाणलोट विकासाचे कामे व्हावे यासाठी सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा आधार होता प्रशिक्षण. भाग घेणाऱ्या प्रत्येक गावाला ५ ग्रामस्थ प्रशिक्षणाला पाठविणे बंधनकारक होते. प्रशिक्षणाचे दोन प्रमुख भाग होते. पहिला भाग होता तो तांत्रिक प्रशिक्षणाचा - ज्यात पाणलोट विकासाचे विज्ञान शिकवण्यात आले. पाणी अडवा नि जिरवा सांगणे सोपे आहे परंतु ते नेमके कसे करावे याचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. WOTR नावाची संस्था या क्षेत्रात तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून काम करीत आहे. WOTR च्या इंजिनीअर्सनी ही जबाबदारी सांभाळली.हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल होते. त्यात लेक्चरबाजी अजिबात नव्हती. निरीक्षणातून, कृतीतूनच शिकायचे होते. प्रशिक्षणासाठी आम्ही अशा गावांची निवड केली होती जिथे पाऊस अत्यंत कमी पडला होता तरी ती गावे पाण्याच्या बाबतीत समृद्ध होती. कारण त्या गावांनी पाणलोट विकासाची कामे वैज्ञानिक पद्धतीने केली होती. पहिल्याच दिवशी प्रशिक्षणार्थी यजमान गावाची शिवार फेरी करीत असत. त्या शिवारफेरीत त्यांना विहिरीतील पाणी दिसे, मे महिन्यात चालणारी शेती दिसे, गावातील समृद्धी दिसे. त्याचबरोबर यजमान गावात झालेले जलसंधारणाचे लहान मोठे उपचारही दिसत असतात. कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे. कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे. मग पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात हे पुढच्या तीन दिवसांत शिकवले जात असे. काही उपचार ते स्वत: शिबिरादरम्यान निर्माण करत असत. तर बाकी उपचार कसे करतात ते फिल्म्स आणि प्रश्नोत्तरामार्फत शिकवले जात असे. प्रशिक्षणाचा एक भाग तांत्रिक होता, तर दुसरा भाग होता सामाजिक. गाव समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्व असे समजावले जात असे. थोडक्यात काय तर ‘माती अडवा पाणी जिरवा’ म्हणजे काय करायचे? एवढेच न सांगता ते कसे करायचे यावर आम्ही सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून भर दिला. जवळजवळ ८०० प्रशिक्षणार्थी आपापल्या गावी गेले. ते प्रशिक्षण काळात जे जे शिकले ते त्यांनी आपापल्या ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाचे प्रचंड काम केले. नियोजनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व कामे ही ग्रामास्थांनीच केली. शेतकरीच इंजिनीअर होता, शेतकरीच श्रमकरी होता. पाऊस येईल तेव्हा मातीही अडेल, पाणीही जिरेल. आणि याचे पूर्ण श्रेय प्रशिक्षित होऊन आलेल्या शेतकऱ्याचेच असेल.

(जून महिन्याचे मानकरी असलेले लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)