शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाणी अडवा पाणी जिरवा

By admin | Updated: June 19, 2016 01:46 IST

जर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात

- सत्यजीत भटकळजर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात पावसाचे पाणी जमा होत राहील. हे समजवण्यासाठी खेळ आणि नाटक या माध्यमांचा पुरेपूर वापर करण्यात आला. ज्यामुळे कंटाळवाणी भाषणे झाली नाहीत आणि अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात प्रशिक्षण पार पडले.शिबिरादरम्यान या पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात, याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना हडळफच्या माध्यमातून देण्यात आले.पाणी अडवा पाणी जिरवा किंवा माती अडवा पाणी जिरवा या घोषणा बऱ्याच जुन्या आहेत. मग प्रश्न असा उद्भवतो की या घोषणांवर अंमलबजावणी का झाली नाही. पाणी अडवून का जिरवले गेले नाही? एक प्रमुख कारण आहे ते हे की पाणी अडवण्यासाठी, जिरवण्यासाठी गावात एकी होणे खूप गरजेचे आहे.नेहमीच आपण पाणी जिरवण्याऐवजी एकमेकांना जिरवण्यात अधिक रस घेतला. आपण एकमेकांना पाण्यात पाहत राहिलो आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही निवळ घोषणा म्हणून राहिली. ही परिस्थिती बदलावी, गावात एकी निर्माण होऊन पाणलोट विकासाचे कामे व्हावे यासाठी सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा आधार होता प्रशिक्षण. भाग घेणाऱ्या प्रत्येक गावाला ५ ग्रामस्थ प्रशिक्षणाला पाठविणे बंधनकारक होते. प्रशिक्षणाचे दोन प्रमुख भाग होते. पहिला भाग होता तो तांत्रिक प्रशिक्षणाचा - ज्यात पाणलोट विकासाचे विज्ञान शिकवण्यात आले. पाणी अडवा नि जिरवा सांगणे सोपे आहे परंतु ते नेमके कसे करावे याचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. WOTR नावाची संस्था या क्षेत्रात तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून काम करीत आहे. WOTR च्या इंजिनीअर्सनी ही जबाबदारी सांभाळली.हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल होते. त्यात लेक्चरबाजी अजिबात नव्हती. निरीक्षणातून, कृतीतूनच शिकायचे होते. प्रशिक्षणासाठी आम्ही अशा गावांची निवड केली होती जिथे पाऊस अत्यंत कमी पडला होता तरी ती गावे पाण्याच्या बाबतीत समृद्ध होती. कारण त्या गावांनी पाणलोट विकासाची कामे वैज्ञानिक पद्धतीने केली होती. पहिल्याच दिवशी प्रशिक्षणार्थी यजमान गावाची शिवार फेरी करीत असत. त्या शिवारफेरीत त्यांना विहिरीतील पाणी दिसे, मे महिन्यात चालणारी शेती दिसे, गावातील समृद्धी दिसे. त्याचबरोबर यजमान गावात झालेले जलसंधारणाचे लहान मोठे उपचारही दिसत असतात. कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे. कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे. मग पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात हे पुढच्या तीन दिवसांत शिकवले जात असे. काही उपचार ते स्वत: शिबिरादरम्यान निर्माण करत असत. तर बाकी उपचार कसे करतात ते फिल्म्स आणि प्रश्नोत्तरामार्फत शिकवले जात असे. प्रशिक्षणाचा एक भाग तांत्रिक होता, तर दुसरा भाग होता सामाजिक. गाव समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्व असे समजावले जात असे. थोडक्यात काय तर ‘माती अडवा पाणी जिरवा’ म्हणजे काय करायचे? एवढेच न सांगता ते कसे करायचे यावर आम्ही सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून भर दिला. जवळजवळ ८०० प्रशिक्षणार्थी आपापल्या गावी गेले. ते प्रशिक्षण काळात जे जे शिकले ते त्यांनी आपापल्या ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाचे प्रचंड काम केले. नियोजनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व कामे ही ग्रामास्थांनीच केली. शेतकरीच इंजिनीअर होता, शेतकरीच श्रमकरी होता. पाऊस येईल तेव्हा मातीही अडेल, पाणीही जिरेल. आणि याचे पूर्ण श्रेय प्रशिक्षित होऊन आलेल्या शेतकऱ्याचेच असेल.

(जून महिन्याचे मानकरी असलेले लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)