शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

जमीन वापर परवानगी दाखले सादर करा

By admin | Updated: April 7, 2017 02:39 IST

रायगड जिल्ह्यातील आगरदांडा-दिघी खाडी दरम्यानच्या दिघी पोर्ट लि.कंपनीचा परवानगी प्राप्त भूभाग नेमका किती आहे

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आगरदांडा-दिघी खाडी दरम्यानच्या दिघी पोर्ट लि.कंपनीचा परवानगी प्राप्त भूभाग नेमका किती आहे, ३० सप्टेंबर २००५ रोजी दिघी पोर्टला मिळालेल्या पर्यावरण संमतीच्या वेळी दिघी पोर्ट कंपनीद्वारे पर्यावरण मंत्रालयाला भरून देण्यात आलेल्या फॉर्म-१ नुसार किती क्षेत्रफळाच्या भूखंडावर आणि समुद्री किनाऱ्यालगतच्या जमिनीवर दिघी पोर्टला जमीन वापराची संमती दर्शविलेली आहे. त्याबाबतचा नकाशा व फॉर्म -१ ची प्रत न्यायालयात दाखल करण्याचे आदेश ३० मार्च २०१७ रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या न्या. यू.डी. साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिघी पोर्ट ट्रस्टला दिले आहेत.दिघी पोर्टच्या समुद्रातील भरावामुळे बाधित ग्रामस्थ गीता वाढाई यांनी मानवी व पर्यावरण हक्क संरक्षण चळवळीतील अग्रणी अ‍ॅड.असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हे आदेश दिले आहेत. बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडद्वारा विजय गोवर्धनदास कलंत्री, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथोरिटी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, रायगड जिल्हाधिकारी, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना याचिकेत प्रतिवादी केले आहे.दिघी पोर्टला मिळालेल्या पर्यावरण संमतीचा गैरफायदा घेऊन बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी त्यांना अधिकार नसलेल्या समुद्रालगतच्या भूभागावर अतिक्रमण करून तसेच समुद्र किनारपट्टीवर व खाडीभागात अवैध माती, दगड यांचा भराव करीत आहे. बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरने गीता वाढाई यांच्या घरासमोर बेकायदा भराव केला असून समुद्रकिनारपट्टीला कायमस्वरूपी नुकसान पोहोचविले आहे, अशी तक्रार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अ‍ॅड. असीम सरोदे यांच्याद्वारे वाढाई यांनी गेल्या २४ नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल केली आहे.दिघी व नानवली येथील समुद्रकिनाऱ्यावरील भरती आणि ओहोटीच्या पातळीसंदर्भात अजूनही मोजणी झालेली नाही. नानवली येथील समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या बेकायदा भरावातून कृत्रिम भूभाग तयार करण्यात आलेला असून त्यामुळे समुद्रकिनारा सतत समुद्राच्या दिशेने आत सरकविण्यात आलेला आहे. वाळू भरावाचे सपाटीकरण, पाणथळ आणि खाडीभाग बुजवून करण्यात आलेले भराव पर्यावरणाचे कायमस्वरूपी नुकसान, परवानगी नसताना केलेले ब्लास्टिंग व उत्खनन, दिघी पोर्ट परिसरातील अनधिकृत बांधकामे, बेकायदा केलेला गौण खनिज साठा, वाहतूक परवानगी नसतानाही कोळसा व बॉक्साईटची समुद्र किनाऱ्यावरून होणारी वाहतूक अशा अनेक प्रकारच्या बेकायदा कामांमुळे नानवली समुद्र किनारा ओरबाडला जात असल्याचे या पर्यावरणहित याचिकेतून न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)समुद्रकिनाऱ्याची पर्यावरणीय हानी थांबविण्याची प्रक्रिया वाळू भरावाचे सपाटीकरण, पाणथळ आणि खाडीभाग बुजवून करण्यात आलेले भराव पर्यावरणाचे कायमस्वरूपी नुकसान, परवानगी नसताना केलेले ब्लास्टिंग व उत्खनन, दिघी पोर्ट परिसरातील अनधिकृत बांधकामे आदी प्रकारच्या बेकायदा कामांमुळे नानवली समुद्र किनाऱ्याचे नुकसान होत आहे.दिघी व नानवली समुद्रकिनाऱ्यावरील भरती, ओहोटीच्या पातळीसंदर्भात अजूनही मोजणी झालेली नाही. नानवली येथील समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या बेकायदा भरावातून कृत्रिम भूभाग तयार करण्यात आलेला असून त्यामुळे समुद्रकिनारा सतत समुद्राच्या दिशेने आत सरकविण्यात आलेला आहे.बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरने नेमक्या किती भूभागावर अधिकार आहे, पर्यावरण संमतीनुसार त्यांना नेमका किती क्षेत्रफळाचा जमीनभाग वापराची परवानगी आहे याचे स्पष्टीकरण मागविण्यात यावे असा याचिकाकर्त्यांतर्फे केलेला अर्ज राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ३० मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान मान्य केला. यामुळे आता रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्याची आणि पर्यावरणाची होणारी हानी थांबविण्याची महत्त्वाची प्रक्रिया हरित न्यायाधिकरणाऱ्या मार्फत सुरू होईल तसेच समुद्रकिनाऱ्याला लगत उभारल्या गेलेल्या धनदांडग्या कंपन्यांना पर्यावरण रक्षणाची जाणीव होऊ न पर्यावरणीय पारदर्शकता निर्माण होईल असा आशावाद अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केलाआहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मे २०१७ रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे खंडपीठासमोर होणार आहे.