शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

उपअभियंत्यांनी केली पाहणी

By admin | Updated: January 21, 2017 03:44 IST

वाडा तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून पत्रे तुटले आहेत.

वाडा : वाडा तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून पत्रे तुटले आहेत. वर्गखोलीची दुरवस्था झाली असून दरवाजे, खिडक्या निघाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांुना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. याबाबतचे वृत्त बुधवारच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच बांधकाम प्रशासन खडबडून जागे झाले आणि गुरूवारी बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता विजय मोकाशी यांनी शाळेची पाहणी करून ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दोन महिन्यापूर्वीच दिल्याची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून ३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील वर्ग खोलीचे बांधकाम गेल्या २५ ते ३० वर्षापूर्वी करण्यात आले होते. या इमारतीला आता तडे गेले असून पत्र्यांना भोके पडली आहे. दरवाजे व खिडक्या निखळल्या आहेत. धोकादायक म्हणून घोषित केलेल्या या वर्गखोलीत दोन वर्षापासून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकत आहेत. लगतच्या दुसऱ्या खोलीत वर्ग भरवले जात आहेत. त्यांची दुरूस्ती करावी अन्यथा नवीन वर्गखोली बांधावी अशी मागणी शिक्षण प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली होती. मात्र तिच्याकडे प्रशासन गांभिर्याने बघत नव्हते. जर या बाबतचा अहवाल दोन महिन्यापूर्वी दिला तर संबंधित यंत्रणेने त्यावर काय कारवाई केली नसल्यास ती का झाली नाही? याचा खुलासा मात्र सार्वजनिक बांधकामने अद्याप केलेला नाही. (प्रतिनिधी)>अहवाल देऊनही कारवाई का झाली नाही?पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय मोकाशी यांनी मानिवली शाळेला भेट देऊन पाहणी केली. धोकादायक इमारतीचा अहवाल गेल्या दोन महिन्यापूर्वीच शिक्षण विभागाला दिला.त्यांच्यासमवेत वाडा पंचायत समितीच्या सभापती मृणाली नडगे, उपसभापती माधुरी पाटील उपस्थित होत्या. त्यांनी या बाबतचा जाब त्यांना विचारला नाही.