शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वडाळे तलावावर विद्यार्थ्यांची भटकंती

By admin | Updated: April 7, 2017 02:25 IST

ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेलची एकेकाळी तलावांचे शहर म्हणूनही ख्याती होती.

मयूर तांबडे,पनवेल- ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेलची एकेकाळी तलावांचे शहर म्हणूनही ख्याती होती. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच नियमित साफसफाई, स्वच्छतेच्या अभावामुळे बहुतांश तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शहरातील वडाळे तलावाचे मध्यंतरी सुशोभीकरण करण्यात आले. तलावात रोटरी क्लबच्या सहकार्याने कृत्रिम तलाव बांधण्यात आला. मात्र कृत्रिम तलावामुळे याठिकाणी अपघातांची शक्यता वाढली आहे. तलावाच्या संरक्षण भिंतीवरून जवळच्या शाळेतील विद्यार्थी ये-जा करत करताना दिसतात. त्यामुळे जरासा तोल गेला तरी तो जीवघेणा ठरू शकतो. हे टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. पनवेल शहरात वडाळे, कृष्णाळे, इस्त्रायली, लेण्डाले व देवाळे असे पाच तलाव आहेत. यापैकी वडाळे तलावात रोटरी क्लबने २०१६ मध्ये जवळपास १६ लाख रु पये खर्च करून गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव बांधण्यात आला. मात्र याठिकाणी बांधलेल्या भिंतीवर अनेकदा शालेय विद्यार्थी बसलेले दिसतात, तर काही विद्यार्थी बिनधास्त भिंतीवरून फिरत असल्याने तलावात पडून अप्रिय घटना घडू शकते. तलावाच्या शेजारी इंग्रजी व मराठी माध्यमाची शाळा आहे. शाळेत पाच ते सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पूर्वी शाळा सुटली की, विद्यार्थी तलावाच्या शेजारून चालत येत असत. मात्र वडाळे तलावात बांधलेल्या कृत्रिम तलावामुळे तलावाच्या मधोमध जाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. या भिंतीवर झाडांच्या कुंड्या उभ्या केल्या आहेत, तसेच लोखंडी गेटही उभारले आहे. असे असताना शाळेतील विद्यार्थी भिंतीवरून चालत पलीकडे जातात. कृत्रिम तलावात अजूनही पाणीसाठा असल्याने विद्यार्थी खाली पडून जखमी किंवा बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळेने तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना तलावाच्या भिंतीवरून चालत न जाण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच सुरक्षारक्षक नेमण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.दरवर्षी वडाळे तलावात शेकडो गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात गाळ शिल्लक राहतो. याचाच विचार करून पनवेल रोटरी क्लबने वडाळे तलावात स्वच्छता, सुशोभीकरण राबविण्याचे ठरवले होते. त्यानुसार तलावात विसर्जन घाट बनविण्यात आला. हा घाट काँक्रीटचा नसून गाबीएल टेक्नॉलॉजीचा वापर करून बांधण्यात आला आहे. मात्र शाळा सुटल्यानंतर कृत्रिम तलावाच्या भिंतीवरून अनेक जण फिरताना दिसतात. विद्यार्थी शाळा सुटल्यावर मजा, मस्ती करण्यासाठी तलावाच्या बांधावर जातात. त्यामुळे कृत्रिम तलावात खाली पडून याठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.>शाळेतील विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. वडाळे तलावातील कृत्रिम तलावाच्या संरक्षण भिंतीवर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही कुणी आढळल्यास, पालकांशी संपर्क करण्यात येईल. - प्रल्हाद वाघमारे, उपमुख्याध्यापक, व्ही.के.हायस्कूल, पनवेल