शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
2
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
3
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
4
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
5
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
6
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
7
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
8
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
9
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
10
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
11
"त्याला कशाला दोष देता?"; सुनील गावसकरांनी घेतली गौतम गंभीरची बाजू, दोषी कोण तेही सांगितलं
12
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
13
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
14
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
15
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
16
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
17
एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट
18
लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...
19
"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
20
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!
Daily Top 2Weekly Top 5

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

By admin | Updated: June 28, 2017 18:27 IST

प्रवेश न मिळाल्यामुळे निराश झालेल्या वसमत तालुक्यातील गिरगांव येथील वर्षा व्यंकटराव नादरे (१९) या विद्यार्थीनीने गोदावरीत उडी घेवून आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत नांदेड, दि. 28 - बारावीचा निकाल नुकताच लागला असून आवडत्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे निराश झालेल्या वसमत तालुक्यातील गिरगांव येथील वर्षा व्यंकटराव नादरे (१९) या विद्यार्थीनीने गोदावरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

वर्षा नादरे हिचे कुटुंबिय हिंगोली जिल्ह्यातील गिरगांव येथे राहते. वर्षा ही भाऊ व बहिणीसोबत शहरातील बाबानगर परिसरात राहत होती. याच भागात असलेल्या यशवंत महाविद्यालयातच तीने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. परंतु बारावीत अपेक्षित टक्केवारी न मिळाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून निराश होती.

त्यात पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीने यशवंत महाविद्यालयात अर्जही केला होता़ परंतु टक्केवारी कमी असल्यामुळे तिला प्रवेश मिळाला नाही. तर तिच्याच सोबत राहत असलेल्या भाऊ आणि बहिणीला मात्र यशवंतमध्ये प्रवेश मिळाला. त्यामुळे ती आणखीच निराश झाली. त्यात मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ती अचानक घरातून बाहेर पडली. ही बाब भाऊ आणि बहिणीला समजल्यानंतर त्यांनी तिचा शोधही घेतला. परंतु सापडली नाही़ बुधवारी सकाळी गोदावरीच्या पात्रात तिचे प्रेत आढळले. वर्षा हिने गोवर्धन घाट पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची नोंद वजिराबाद पोलिसांनी केली आहे.