शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

By admin | Updated: June 28, 2017 18:27 IST

प्रवेश न मिळाल्यामुळे निराश झालेल्या वसमत तालुक्यातील गिरगांव येथील वर्षा व्यंकटराव नादरे (१९) या विद्यार्थीनीने गोदावरीत उडी घेवून आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत नांदेड, दि. 28 - बारावीचा निकाल नुकताच लागला असून आवडत्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे निराश झालेल्या वसमत तालुक्यातील गिरगांव येथील वर्षा व्यंकटराव नादरे (१९) या विद्यार्थीनीने गोदावरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

वर्षा नादरे हिचे कुटुंबिय हिंगोली जिल्ह्यातील गिरगांव येथे राहते. वर्षा ही भाऊ व बहिणीसोबत शहरातील बाबानगर परिसरात राहत होती. याच भागात असलेल्या यशवंत महाविद्यालयातच तीने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. परंतु बारावीत अपेक्षित टक्केवारी न मिळाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून निराश होती.

त्यात पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीने यशवंत महाविद्यालयात अर्जही केला होता़ परंतु टक्केवारी कमी असल्यामुळे तिला प्रवेश मिळाला नाही. तर तिच्याच सोबत राहत असलेल्या भाऊ आणि बहिणीला मात्र यशवंतमध्ये प्रवेश मिळाला. त्यामुळे ती आणखीच निराश झाली. त्यात मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ती अचानक घरातून बाहेर पडली. ही बाब भाऊ आणि बहिणीला समजल्यानंतर त्यांनी तिचा शोधही घेतला. परंतु सापडली नाही़ बुधवारी सकाळी गोदावरीच्या पात्रात तिचे प्रेत आढळले. वर्षा हिने गोवर्धन घाट पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची नोंद वजिराबाद पोलिसांनी केली आहे.