शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

रिझवानचे ‘टार्गेट’ कॉलेजचे विद्यार्थी

By admin | Updated: July 25, 2016 04:56 IST

कॉलेजमधील तरुण-तरुणी, त्यातही सोशल मीडियावर सर्वाधिक काळ घालवणारे आणि आक्रमक विचारसरणीचे आकर्षण असणारे तरुण हे इसिसचा हस्तक असलेल्या रिझवान खानचे टार्गेट असल्याचे प्राथमिक

कल्याण : कॉलेजमधील तरुण-तरुणी, त्यातही सोशल मीडियावर सर्वाधिक काळ घालवणारे आणि आक्रमक विचारसरणीचे आकर्षण असणारे तरुण हे इसिसचा हस्तक असलेल्या रिझवान खानचे टार्गेट असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तपणे कारवाई करून शनिवारी रिझवानला कल्याण येथून अटक केली आहे. अंजुम सलीम भाटकर या घरमालकिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वेगवेगळ्या गुन्ह्यांत तुरुंगवास भोगलेल्यांवर रिझवानचे लक्ष होते. विशिष्ट समुदायालाच गुन्ह्यांत अडकवले जाते, अशी भावना ज्यांच्यात बळावलेली असते त्याचा फायदा घेत त्यांच्यावर आपल्या विचारसरणीचे जाळे टाकण्याचा प्रयत्न रिझवान करीत असे, असाही आरोपही त्याच्यावर केला जातो. रिझवान सहा वर्षांपूर्वी कल्याणला आला. पत्रीपुलानजीक असलेल्या सूर्यमुखी इमारतीत पहिल्या मजल्यावर तो भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. या उच्चभ्रू वस्तीत राहण्यासाठी त्याला नेमकी कोठून आर्थिक मदत केली जात होती, हेही शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय तो रेल्वेत फेरी करून कटलरी साहित्य विकत असे. तो शिकवण्याही घेत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिकवणीसाठी येणाऱ्यांची माहितीही गोळा केली जात आहे.कल्याणमध्ये आल्यावर रिझवानने लग्न लावून देणाऱ्या वकिलांचा एजंट म्हणूनही काम सुरू केले. ख्रिस्ती आणि हिंदूधर्मीय तरुणींच्या धर्मांतराची व त्यातून लग्ने लावल्याची कागदपत्रे त्याच्या घरातून सापडली. त्यातीलच एक जोडपे केरळमधून इसिसमध्ये भरतीसाठी गेल्याने लव्ह जिहाद, धर्मांतर प्रसार असे मुद्दे चर्चेत आले. (प्रतिनिधी)मे २०१४मध्ये कल्याणमधून सहिम तानकी, आरिब माजिद, अमान तांडेल आणि फहाद शेख हे चार तरुण बेपत्ता झाले होते. ते इसिसमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी मोबाइलवरून मेसेज करून कळवले होते. त्यानंतर, दहशतवादी कारवायांत आरिब माजिद मारला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, तो जिवंत भारतात परतल्यावर त्याला अटक करण्यात आली. मात्र, अद्याप सहिम तानकी, अमान तांडेल आणि फहाद शेख यांचा थांगपत्ता नाही. हे चारही तरुण रिझवान खान याच्या सान्निध्यात होते का, या अंगानेही दहशतवादविरोधी पथक तपास करीत आहे. सहा महिन्यांपूर्वी सना फातिमा या महिलेने अनेक जणांकडून एक लाख रुपये गोळा करून त्याबदल्यात महिन्याला १२ हजारांचे व्याज देण्याचा धंदा केला होता. त्यातून तिने ४० कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणाचा भांडाफोड करून फसवले गेलेल्यांना न्याय मिळवून देण्यात रिझवानची महत्त्वाची भूमिका होती. मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेने सना फातिमा हिला अटक केली होती. त्यानंतर, तो फसवल्या गेलेल्यांशी नेमक्या कोणत्या प्रकारे संपर्कात होता, याचाही तपास केला जात आहे.रिझवान खान हा मूळचा केरळचा आहे. केरळमधून २१ तरुण-तरुणी बेपत्ता आहेत. ते इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केरळमधील बेस्टी व मेरीन यांनाही धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले होते. नवी मुंबईतील आर.सी. कुरेशी याने मुस्लीम धर्मात येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता. नंतर त्यांचे मतपरिवर्तन करून इसिसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, बेस्टी व मेरीन बेपत्ता असल्याची माहिती त्यांचे मेहुणे येरीन यांनी चौकशीत दिली होती. खान हा कुरेशीच्या सान्निध्यात होता. तसेच तो इंडियन इस्लामिक रिसर्च सेंटर या एनजीओचे काम करीत होता.