शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

दहावी-बारावीच्या पुनर्परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

By admin | Updated: June 28, 2016 00:33 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने नापास विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/ मार्च २०१६ च्या दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने नापास विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, यंदा बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी अर्जच केले नाहीत. त्यामुळे परीक्षेची संधी असूनही अनेक विद्यार्थी पुनर्परीक्षेकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेस कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचे एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यातील ११ लाख ४२ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १ लाख ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी नापास झाले. त्याच प्रमाणे मार्च २०१६ मध्ये राज्यातील १६ लाख १ हजार ४०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीत नापास झाले. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने राज्य मंडळातर्फे जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर आहे. राज्य मंडळातर्फे दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी १० ते २४ जून या कालावधीसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. तसेच २४ जूननंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत दिली आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना ३० मे ते ९ जून या कालावधीत नियमित शुल्कासह बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदत दिली होती. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज केले असून, सध्या १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे जुलैमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे ५० तर दहावीच्या परीक्षेस सुमारे २५ हजार विद्यार्थी अर्ज करत नसल्याचे समोर आले आहे.>विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने राज्य मंडळातर्फे जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. >राज्य मंडळातर्फे दहावीच्या पुर्नरपरीक्षेसाठी १० ते २४ जून या कलावधीसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. तसेच 24 जूननंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत दिली आली आहे. १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज