शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या पुनर्परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

By admin | Updated: June 28, 2016 00:33 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने नापास विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/ मार्च २०१६ च्या दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने नापास विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, यंदा बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी अर्जच केले नाहीत. त्यामुळे परीक्षेची संधी असूनही अनेक विद्यार्थी पुनर्परीक्षेकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेस कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचे एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यातील ११ लाख ४२ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १ लाख ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी नापास झाले. त्याच प्रमाणे मार्च २०१६ मध्ये राज्यातील १६ लाख १ हजार ४०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीत नापास झाले. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने राज्य मंडळातर्फे जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर आहे. राज्य मंडळातर्फे दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी १० ते २४ जून या कालावधीसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. तसेच २४ जूननंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत दिली आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना ३० मे ते ९ जून या कालावधीत नियमित शुल्कासह बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदत दिली होती. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज केले असून, सध्या १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे जुलैमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे ५० तर दहावीच्या परीक्षेस सुमारे २५ हजार विद्यार्थी अर्ज करत नसल्याचे समोर आले आहे.>विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने राज्य मंडळातर्फे जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. >राज्य मंडळातर्फे दहावीच्या पुर्नरपरीक्षेसाठी १० ते २४ जून या कलावधीसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. तसेच 24 जूननंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत दिली आली आहे. १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज