शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात ?

By admin | Updated: July 1, 2016 04:13 IST

लाईट मोटार व्हेइकल (स्कूल व्हॅन), एसटी आणि बेस्टच्या बसेस नियमांची पायमल्ली करून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालत आहेत

मुंबई : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या लाईट मोटार व्हेइकल (स्कूल व्हॅन), एसटी आणि बेस्टच्या बसेस नियमांची पायमल्ली करून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालत आहेत, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने यासंबंधी राज्य सरकार, परिवहन विभाग आणि परिवहन आयुक्तांना दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी २०१२ मध्ये सुधारित नियम तयार केले आणि स्कूल बसेसना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले. मात्र स्कूल बस व्यतिरिक्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या लाईट मोटार व्हेइकल्सनाही विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी परमीट दिले जात आहे. परंतु, या व्हॅन्सची ‘स्कूल बस’ च्या श्रेणीत गणना करण्यात आली नाही. त्यामुळे या व्हॅन्स स्कूल बससाठी असलेले नियम न पाळता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. त्याशिवाय बेस्ट, एसटीही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी घेण्यात येत नाही. त्यामुळे राज्य सरकारला या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘पॅरेंट-टीचर असोसिएशन युनायटेड फोरम’ ने केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेद्वारे गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मुंबई व उपनगरांतील विद्यार्थी अशा वाहनांचा (व्हॅन, बेस्ट) वापर करतात. त्याशिवाय उर्वरित राज्यातील मुलेही शाळेत जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. नियमांची पायमल्ली करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यात येतो, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. याचिकेनुसार, राज्य सरकारच्या नियमानुसार, शाळा आणि आॅपरेटर्समध्ये करार होणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ‘स्कूल बस’ असे लिहीणे बंधनकारक आहे. संबंधित वाहनावर मार्ग, वेळही नमूद करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी महिला वॉर्डन असणे बंधनकारक आहे. मात्र स्कूल व्हॅन, बेस्ट आणि एसटी नियम पाळत नसल्याने मुलांना जीव गमवावा लागत आहे. तसेच बलात्कारासारख्या घटनाही घडत आहेत. आतापर्यंत मुंबईत ११ अपघात झाले. त्यातील आठ विद्यार्थ्यांना नाहक जीव गमवावा लागला आहे.‘विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला वॉर्डन असल्याच पाहिजेत’ असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकार, परिवहन विभागाचे सचिव आणि परिवहन आयुक्तांना दोन आठवड्यांत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)