शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्हा परिषदेच्या ‘बोलक्या’ शाळेत ‘कॉन्व्हेंट’चेही विद्यार्थी परतले !

By admin | Updated: September 13, 2016 12:08 IST

सर्वत्रच कॉन्व्हेंट स्कूलचे फॅड असताना, वाशिम तालुक्यातील सोनखास येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आपल्याकडे परत आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

संतोष वानखडे , ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १३ -  सर्वत्रच कॉन्व्हेंट स्कूलचे फॅड असताना, वाशिम तालुक्यातील सोनखास येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आपल्याकडे परत आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. शाळेच्या बोलक्या भिंती, ज्ञानरचनावादावर आधारित अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमध्ये बसून शिक्षकांची शिकविण्याची कला, मनोरंजनातून शिक्षण आदी अनोख्या उपक्रमामुळे सोनखास जिल्हा परिषदेची शाळा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांपेक्षा खासगी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते, अशी मानसिकता पालकांची बनत असल्याने ग्रामीण भागातही कॉन्व्हेंट संस्कृतीचे भरघोष पिक आल्याचे चित्र सर्वत्रच आहे. वाशिम जिल्ह्यातही ग्रामीण भागात कॉन्व्हेंटच्या शाळांनी स्वत:ची पाळेमुळे मजबूत केली आहेत. साधारणत: दोन वर्षांपूर्वी वाशिम तालुक्यातील सोनखास येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवेश काढून कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेण्याला अनेक पालकांनी पसंती दिली होती. यामुळेच शाळेची पटसंख्या २० ते २५ ने घटली. दोन वर्षांपासून या शाळेने झपाट्याने बदल केल्याने यावर्षी कॉन्व्हेंटमधून २५ विद्यार्थी परत जिल्हा परिषद शाळेत आल्याची आशादायी व समाधानाची बाब आहे. सोनखास येथे जिल्हा परिषदेची वर्ग एक ते सातवीपर्यंतची शाळा असून, पाच शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेची पटसंख्या १२२ असून, शाळेच्या भिंतीवर विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती रंगविण्यात आली आहे. शाळेच्या सर्व भिंती बोलक्या केल्याने साहजिकच विद्यार्थीदेखील ‘बोलके’ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. वर्गामध्ये ज्ञानरचनावादावर आधारित शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविले जाते. या शाळेत विशेष म्हणजे शिक्षकांनी स्वत:ला बसण्यासाठी खुर्ची न ठेवता विद्यार्थ्यांसोबत सतरंजीवर बसून ते अध्यापनाचे कार्य करतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाल्याने विद्यार्थीदेखील या बोलक्या शाळेत रममान होऊन धडे गिरवित आहेत. मुख्याध्यापक जगन्नाथ आरू, शिक्षक नारायण काकडे, विश्वनाथ खानझोडे, संजय सरनाईक, रेखा वाकपांजर या शिक्षकांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आणि गावकºयांच्या सहकार्यातून शाळेच्या भिंती ‘बोलक्या’ बनविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.