शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात दुर्लक्षामुळेच विद्यार्थ्यांना विषबाधा !

By admin | Updated: January 5, 2015 04:26 IST

अस्वच्छ स्वयंपाकगृह, दूषित पाणीपुरवठा, खराब तांदूळ याकडे कोर्टीच्या शिवाजी विद्यालयाच्या शालेय पोषण आहार समितीच्या

करमाळा : अस्वच्छ स्वयंपाकगृह, दूषित पाणीपुरवठा, खराब तांदूळ याकडे कोर्टीच्या शिवाजी विद्यालयाच्या शालेय पोषण आहार समितीच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यानेच तब्बल ११५ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली आहे, अशी फिर्याद गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मुख्याध्यापकासह माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.विद्यार्थी विषबाधा प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत गटशिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी म्हटले आहे की, माध्यान्ह भोजन बनविलेले ठिकाण, धान्याची पाहणी केली असता ही ठिकाणे अस्वच्छ असल्याचे आढळले. तांदळाला उग्रवास येत होता तर इतर कडधान्यात थोडीशी पांढरी भुकटी दिसून आली. बनविण्यात आलेल्या भातासही उग्र्र वास येत होता. अन्न बनविण्यासाठी ज्या टाकीतून पाणी वापरले जाते त्याची पाहणी केली असता टाकीच्या तळाशी शेवाळे तसेच कापडाच्या चिंध्या कुजलेल्या अवस्थेत दिसून आल्या. याला विद्यालयाचे मुख्याध्यापक व स्वयंपाकी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक छगन रामभाऊ माने व अन्न शिजवणारे गणेश जालिंदर अभंग, अश्विन गणेश अभंग, काशीबाई गणेश अभंग यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे.