शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सोलापुरात दुर्लक्षामुळेच विद्यार्थ्यांना विषबाधा !

By admin | Updated: January 5, 2015 04:26 IST

अस्वच्छ स्वयंपाकगृह, दूषित पाणीपुरवठा, खराब तांदूळ याकडे कोर्टीच्या शिवाजी विद्यालयाच्या शालेय पोषण आहार समितीच्या

करमाळा : अस्वच्छ स्वयंपाकगृह, दूषित पाणीपुरवठा, खराब तांदूळ याकडे कोर्टीच्या शिवाजी विद्यालयाच्या शालेय पोषण आहार समितीच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यानेच तब्बल ११५ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली आहे, अशी फिर्याद गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मुख्याध्यापकासह माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.विद्यार्थी विषबाधा प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत गटशिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी म्हटले आहे की, माध्यान्ह भोजन बनविलेले ठिकाण, धान्याची पाहणी केली असता ही ठिकाणे अस्वच्छ असल्याचे आढळले. तांदळाला उग्रवास येत होता तर इतर कडधान्यात थोडीशी पांढरी भुकटी दिसून आली. बनविण्यात आलेल्या भातासही उग्र्र वास येत होता. अन्न बनविण्यासाठी ज्या टाकीतून पाणी वापरले जाते त्याची पाहणी केली असता टाकीच्या तळाशी शेवाळे तसेच कापडाच्या चिंध्या कुजलेल्या अवस्थेत दिसून आल्या. याला विद्यालयाचे मुख्याध्यापक व स्वयंपाकी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक छगन रामभाऊ माने व अन्न शिजवणारे गणेश जालिंदर अभंग, अश्विन गणेश अभंग, काशीबाई गणेश अभंग यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे.