शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

संवादासाठी विद्यार्थी राजी

By admin | Updated: January 9, 2016 01:44 IST

एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतरही गजेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली.

पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतरही गजेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या सादाला प्रतिसाद म्हणून का होईना त्यांच्याकडून निमंत्रण आल्यास आमचे काही विद्यार्थी त्यांच्याशी संवाद साधण्यास जाऊ शकतील. तसेच पुनश्च ते संस्थेमध्ये आल्यास त्यांना कोणताही विरोध केला जाणार नाही, अशी मवाळ भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान असलेली व्यक्ती ही विद्या परिषदेच्या प्रमुखपदी कार्यरत असते. त्यामुळे लायकीची नसलेली व्यक्ती शैक्षणिक निर्णय कसे घेऊ शकते, हीच गोष्ट विद्यार्थ्यांना खटकली असल्याने चौहान यांच्या नावाला विरोध दर्शवित तब्बल १३९ दिवस त्यांनी संप पुकारला. गुरुवारीही नियामक मंडळाच्या पहिल्या बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत चौहान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. चौहान अध्यक्षपदी विराजमान झाले असले तरी ते काय निर्णय घेतात यावर आंदोलन सुरू ठेवायचे का नाही, हे ठरविण्यात येईल. मात्र त्यांनी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर त्यांनी निमंत्रण दिल्यास आमचे काही विद्यार्थी संवाद साधण्यास नक्कीच जाऊ शकतील, असेही तो म्हणाला. बैठकीपूर्वी आंदोलन करण्यासंदर्भात काही ठरले नव्हते. ते प्रातिनिधिक आंदोलन होते. मात्र पुन्हा चौहान संस्थेत आल्यास आम्ही कदाचित आंदोलन करणारही नाही असेही त्याने सांगितले. (प्रतिनिधी)