शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

संवादासाठी विद्यार्थी राजी

By admin | Updated: January 9, 2016 01:44 IST

एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतरही गजेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली.

पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतरही गजेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या सादाला प्रतिसाद म्हणून का होईना त्यांच्याकडून निमंत्रण आल्यास आमचे काही विद्यार्थी त्यांच्याशी संवाद साधण्यास जाऊ शकतील. तसेच पुनश्च ते संस्थेमध्ये आल्यास त्यांना कोणताही विरोध केला जाणार नाही, अशी मवाळ भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान असलेली व्यक्ती ही विद्या परिषदेच्या प्रमुखपदी कार्यरत असते. त्यामुळे लायकीची नसलेली व्यक्ती शैक्षणिक निर्णय कसे घेऊ शकते, हीच गोष्ट विद्यार्थ्यांना खटकली असल्याने चौहान यांच्या नावाला विरोध दर्शवित तब्बल १३९ दिवस त्यांनी संप पुकारला. गुरुवारीही नियामक मंडळाच्या पहिल्या बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत चौहान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. चौहान अध्यक्षपदी विराजमान झाले असले तरी ते काय निर्णय घेतात यावर आंदोलन सुरू ठेवायचे का नाही, हे ठरविण्यात येईल. मात्र त्यांनी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर त्यांनी निमंत्रण दिल्यास आमचे काही विद्यार्थी संवाद साधण्यास नक्कीच जाऊ शकतील, असेही तो म्हणाला. बैठकीपूर्वी आंदोलन करण्यासंदर्भात काही ठरले नव्हते. ते प्रातिनिधिक आंदोलन होते. मात्र पुन्हा चौहान संस्थेत आल्यास आम्ही कदाचित आंदोलन करणारही नाही असेही त्याने सांगितले. (प्रतिनिधी)