शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश व पुस्तकांसाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: November 23, 2015 01:37 IST

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने केवळ गणवेश व पुस्तकांसाठी आत्महत्या केल्याने दुष्काळाची दाहकता पुन्हा ठसठशीतपणे अधोरेखित.

रिधोरा (अकोला): दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून, रविवारी एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने केवळ गणवेश व पुस्तकांसाठी आत्महत्या केल्याने, दुष्काळाची दाहकता ठसठशीतपणे अधोरेखित झाली. सततच्या नापिकीमुळे आपल्या शिक्षणासाठीही कुटुंबाकडे पैसे नसल्याचे पाहून, चिंतातूर झालेल्या बाळापूर तालुक्यातील या नववीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि पंचक्रोशीत खळबळ उडाली. बाळापूर तालुक्यातील दधम येथे विश्‍वनाथ खुळे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. मोठा मुलगा वैभव हा इयत्ता अकरावीत शिकत असून, लहान मुलगा विशाल हा अकोला येथील महाराणा प्रताप विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. खुळे कुटुंबाकडे दोन एकर शेती आहे. गतवर्षी त्यांना नापिकी झाली. त्यामुळे यंदा त्यांनी खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी कंबर कसली. संपूर्ण कुटुंब शेतात राबले, सोयाबीन पेरले; मात्र यंदाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकाला बसला. मशागत व लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच आर्थिक संकटात सापडले. अशा स्थितीत आपल्या शिक्षणासाठी पैशांची जुळवाजुळव कशी होईल, आपले शिक्षण कसे पूर्ण होईल, या विवंचनेतून विशालला नैराश्य आले. या नैराश्यातून त्याने रविवारी सकाळी विषारी औषध प्राशन केले. ही बाब त्याच्या कुटुंबीयाच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी तत्काळ अकोला येथे रवाना करण्यात आले; मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

*विशाल अभ्यासात होता हुशार!

आत्महत्या केलेला विद्यार्थी विशाल खुळे हा अभ्यासात हुशार होता. काही दिवसांपासून तो आजारी होता, असेही काही ग्रामस्थांनी सांगितले. नापिकीमुळे उत्सवांवर विरजण खुळे कुटुंबीय सतत दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. नापिकीमुळे जवळ पैसा नाही. त्यामुळे दसरा, दिवाळीसारखे सणही ते साजरे करू शकले नाही. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कोठून आणावा, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता.

**गणवेशासाठी हट्ट

      विशालने दिवाळीपूर्वीपासूनच गणवेश आणि पाठय़पुस्तकांसाठी हट्ट धरला होता; मात्र पैसेच नसल्याने त्याचा हट्ट पूर्ण होत नव्हता. त्याला काही पुस्तके मिळाली होती. उर्वरित पुस्तकांसाठी त्याचा आग्रह कायम होता.

***बॅँकेचे ४0 हजार रुपयांचे कर्ज

    विशालचे वडील विश्‍वनाथ खुळे यांनी शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून ४0 हजार रुपयांचे कर्ज काढले; मात्र सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडता आलेले नाही.