शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

गणवेश व पुस्तकांसाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: November 23, 2015 01:37 IST

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने केवळ गणवेश व पुस्तकांसाठी आत्महत्या केल्याने दुष्काळाची दाहकता पुन्हा ठसठशीतपणे अधोरेखित.

रिधोरा (अकोला): दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून, रविवारी एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने केवळ गणवेश व पुस्तकांसाठी आत्महत्या केल्याने, दुष्काळाची दाहकता ठसठशीतपणे अधोरेखित झाली. सततच्या नापिकीमुळे आपल्या शिक्षणासाठीही कुटुंबाकडे पैसे नसल्याचे पाहून, चिंतातूर झालेल्या बाळापूर तालुक्यातील या नववीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि पंचक्रोशीत खळबळ उडाली. बाळापूर तालुक्यातील दधम येथे विश्‍वनाथ खुळे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. मोठा मुलगा वैभव हा इयत्ता अकरावीत शिकत असून, लहान मुलगा विशाल हा अकोला येथील महाराणा प्रताप विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. खुळे कुटुंबाकडे दोन एकर शेती आहे. गतवर्षी त्यांना नापिकी झाली. त्यामुळे यंदा त्यांनी खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी कंबर कसली. संपूर्ण कुटुंब शेतात राबले, सोयाबीन पेरले; मात्र यंदाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकाला बसला. मशागत व लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच आर्थिक संकटात सापडले. अशा स्थितीत आपल्या शिक्षणासाठी पैशांची जुळवाजुळव कशी होईल, आपले शिक्षण कसे पूर्ण होईल, या विवंचनेतून विशालला नैराश्य आले. या नैराश्यातून त्याने रविवारी सकाळी विषारी औषध प्राशन केले. ही बाब त्याच्या कुटुंबीयाच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी तत्काळ अकोला येथे रवाना करण्यात आले; मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

*विशाल अभ्यासात होता हुशार!

आत्महत्या केलेला विद्यार्थी विशाल खुळे हा अभ्यासात हुशार होता. काही दिवसांपासून तो आजारी होता, असेही काही ग्रामस्थांनी सांगितले. नापिकीमुळे उत्सवांवर विरजण खुळे कुटुंबीय सतत दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. नापिकीमुळे जवळ पैसा नाही. त्यामुळे दसरा, दिवाळीसारखे सणही ते साजरे करू शकले नाही. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कोठून आणावा, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता.

**गणवेशासाठी हट्ट

      विशालने दिवाळीपूर्वीपासूनच गणवेश आणि पाठय़पुस्तकांसाठी हट्ट धरला होता; मात्र पैसेच नसल्याने त्याचा हट्ट पूर्ण होत नव्हता. त्याला काही पुस्तके मिळाली होती. उर्वरित पुस्तकांसाठी त्याचा आग्रह कायम होता.

***बॅँकेचे ४0 हजार रुपयांचे कर्ज

    विशालचे वडील विश्‍वनाथ खुळे यांनी शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून ४0 हजार रुपयांचे कर्ज काढले; मात्र सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडता आलेले नाही.