शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

अकरावीत प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: July 26, 2016 01:56 IST

खासगी संस्थांकडून डोनेशनची मागणी; गरिबीमुळे केली आत्महत्या.

जानेफळ (जि. बुलडाणा) : दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार, या नैराश्यापोटी घाटनांद्रा ता. मेहकर येथील एका विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. जया विजय राठोड असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. जया खामगाव येथून दहावी उत्तीर्ण झाली होती. मात्र, तिला ४५ टक्के गुण मिळाले होते. कमी गुण मिळाले, तरीही जयाला पुढे शिकण्याची जिद्द होती व तसे तिने वडिलांना सांगितले होते. त्यामुळे विजय राठोड यांनी तिच्या अकरावीच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक महाविद्यालयांच्या पायर्‍या झिजवूनही गुण कमी असल्याने तिला प्रवेश मिळण्यात अडचणी येत होत्या. अनेक महाविद्यालयांनी त्यांना डोनेशनही मागितल्याची माहिती आहे; परंतु आर्थिक क्षमता नसल्याने राठोड महाविद्यालयांची डोनेशनची अट पूर्ण करू शकले नाहीत.वडिलांची होणारी फरपट पाहून व आता शिक्षणापासून वंचित राहावे लागणार, यामुळे जया निराश झाली होती. या नैराश्यातूनच अखेर २५ जुलै रोजी सकाळी घरातील सर्व जण झोपेत असताना घराशेजारच्या विहिरीत तिने आत्महत्या केली. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याच्या भीतीने जयाने आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गरिबीने घेतला बळी!एसटी बसची पास काढण्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे मागील वर्षी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. अशीच काहीशी घाटनांद्रा येथील ही घटना आहे. मृतक जया राठोड हिचे वडील अल्पभूूधारक आहेत. मागील दोन वर्षांपासून नापिकीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मागील वर्षी पेरणीसाठी काढलेले बँकेचे ५0 हजार रुपये कर्ज डोक्यावर आहे. यावर्षी सुद्धा पेरणीसाठी उसणवारी करावी लागली. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे विजय राठोड यांना मुलीच्या शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागणार होता. मुलींच्या शिक्षणावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही गरिबीमुळे अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याच गरिबीमुळे आज पुन्हा एका सावित्रीला आपली जीवनयात्रा संपवावी लागली.