शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

विद्यार्थी सायबर गुन्हेगारीत

By admin | Updated: May 18, 2015 03:48 IST

सायबर गुन्हेगारीचे लोण आता तरुणांपुरते मर्यादित राहिले नसून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही त्यात अडकू लागले आहेत.

वीरेंद्रकुमार जोगी, नागपूरसायबर गुन्हेगारीचे लोण आता तरुणांपुरते मर्यादित राहिले नसून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही त्यात अडकू लागले आहेत. १८ वर्षांखालील अल्पवयीन गुन्हेगारांवर कोणत्या नियमानुसार कारवाई करावी याबाबत कोणतीही तरतूद माहिती तंत्रज्ञान कायद्यात नाही. सायबर गुन्हेगारीत आरोपी म्हणून १८ वर्षांहून कमी वय असलेल्यांचा जरी समावेश असला तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यातच आली नसल्याचे धक्कादायक वास्तव इंडियन सायबर आर्मीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सोशल मीडियावर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भारतात २०१४ साली २ कोटी ४३ लाख इंटरनेट युजर्स होते, त्यापैकी १ कोटी ६ लाख वापरकर्ते दररोज सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे समोर आले. स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणे सोपे झाले आहे. आयटी अ‍ॅक्ट २००० नुसार कोणत्याही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होण्यासाठी किमान वय १८ वर्षे आहे. मात्र आॅपरेटर्स १३ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला सोशल मीडियावर अकाऊंट उघडण्यास परवानगी देते. सर्वांत जास्त सायबर गुन्हेगार १८ ते ३० वयोगटातील असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. सोशल मीडिया वापराबाबतचे कायदे व सोशल मीडिया आॅपरेटर्सचे नियम वेगवेगळे असल्याने एक नवीनच सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. स्क्रिप्ट किडिंगसोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अधिकाधिक मित्र करता यावेत यासाठी पासवर्ड कसा ब्रेक करावा याचे धडे विद्यार्थी मिळवित असतात. अनेक सर्च इंजिनवर ही माहिती उपलब्ध आहे. यामुळे माहिती मिळवून पासवर्ड ब्रेक करणे सोपे होते. पासवर्ड ब्रेक झाल्याने ते अकाऊंट सर्वांसाठी खुले होते व सहजपणे हाताळता येते. या पद्धतीला ‘स्क्रिप्ट किडिंग’ म्हटले जाते. भारतात यावर पूर्णत: बंदी आहे. भारतीय आयटी अ‍ॅक्ट २००० नुसार सोशल मीडियावर वापर करणाऱ्याचे वय कमीत कमी १८ वर्षे असावे. आॅपरेटर्सच्या नियमावलीनुसार सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होण्याचे वय हे त्यातुलनेत साधारणपणे पाच वर्षांनी कमी आहे. नियम सर्वत्र सारखे हवेलॅपटॉप, स्मार्टफोनच्या वापर वाढल्याने सायबर गुन्हे वाढले आहे. स्मार्टफोनवरून सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ते सहजतेने हॅक करता येते. जगात इंटरनेट सर्वत्र सारख्याच पद्धतीने वापरले जात असल्याने त्याचे नियमही सारखे असावेत, अशी माहिती इंडियन सायबर आर्मीचे संचालक अमेय बावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.