शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

विद्यार्थी सायबर गुन्हेगारीत

By admin | Updated: May 18, 2015 03:48 IST

सायबर गुन्हेगारीचे लोण आता तरुणांपुरते मर्यादित राहिले नसून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही त्यात अडकू लागले आहेत.

वीरेंद्रकुमार जोगी, नागपूरसायबर गुन्हेगारीचे लोण आता तरुणांपुरते मर्यादित राहिले नसून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही त्यात अडकू लागले आहेत. १८ वर्षांखालील अल्पवयीन गुन्हेगारांवर कोणत्या नियमानुसार कारवाई करावी याबाबत कोणतीही तरतूद माहिती तंत्रज्ञान कायद्यात नाही. सायबर गुन्हेगारीत आरोपी म्हणून १८ वर्षांहून कमी वय असलेल्यांचा जरी समावेश असला तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यातच आली नसल्याचे धक्कादायक वास्तव इंडियन सायबर आर्मीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सोशल मीडियावर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भारतात २०१४ साली २ कोटी ४३ लाख इंटरनेट युजर्स होते, त्यापैकी १ कोटी ६ लाख वापरकर्ते दररोज सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे समोर आले. स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणे सोपे झाले आहे. आयटी अ‍ॅक्ट २००० नुसार कोणत्याही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होण्यासाठी किमान वय १८ वर्षे आहे. मात्र आॅपरेटर्स १३ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला सोशल मीडियावर अकाऊंट उघडण्यास परवानगी देते. सर्वांत जास्त सायबर गुन्हेगार १८ ते ३० वयोगटातील असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. सोशल मीडिया वापराबाबतचे कायदे व सोशल मीडिया आॅपरेटर्सचे नियम वेगवेगळे असल्याने एक नवीनच सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. स्क्रिप्ट किडिंगसोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अधिकाधिक मित्र करता यावेत यासाठी पासवर्ड कसा ब्रेक करावा याचे धडे विद्यार्थी मिळवित असतात. अनेक सर्च इंजिनवर ही माहिती उपलब्ध आहे. यामुळे माहिती मिळवून पासवर्ड ब्रेक करणे सोपे होते. पासवर्ड ब्रेक झाल्याने ते अकाऊंट सर्वांसाठी खुले होते व सहजपणे हाताळता येते. या पद्धतीला ‘स्क्रिप्ट किडिंग’ म्हटले जाते. भारतात यावर पूर्णत: बंदी आहे. भारतीय आयटी अ‍ॅक्ट २००० नुसार सोशल मीडियावर वापर करणाऱ्याचे वय कमीत कमी १८ वर्षे असावे. आॅपरेटर्सच्या नियमावलीनुसार सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होण्याचे वय हे त्यातुलनेत साधारणपणे पाच वर्षांनी कमी आहे. नियम सर्वत्र सारखे हवेलॅपटॉप, स्मार्टफोनच्या वापर वाढल्याने सायबर गुन्हे वाढले आहे. स्मार्टफोनवरून सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ते सहजतेने हॅक करता येते. जगात इंटरनेट सर्वत्र सारख्याच पद्धतीने वापरले जात असल्याने त्याचे नियमही सारखे असावेत, अशी माहिती इंडियन सायबर आर्मीचे संचालक अमेय बावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.