शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत बदलीचे नियम धाब्यावर

By admin | Updated: June 13, 2016 05:21 IST

एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचे आदेश काढताना नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

सुशांत मोरे,

मुंबई- एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचे आदेश काढताना नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अशा ७0६ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश एप्रिलमध्ये काढण्यात आले असून, ते नियमित करण्यासाठी आता महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्याला गंभीर आजार असल्यास किंवा पती-पत्नीला एकाच ठिकाणी राहता यावे, यासाठी बदलीचा विनंती अर्ज करता येतो. मात्र एसटीत हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. एप्रिलमध्ये राज्यातील सुमारे ७0६ कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी एसटी महामंडळाकडे विनंती अर्ज केले होते. यामध्ये चालक, वाहक, लिपिक, लेखापाल, वाहतूक निरीक्षक यांचा समावेश होता. या बदल्यांचे आदेश एसटी मुख्यालयातील संबंधित विभागाकडून काढण्यात आले. मात्र हे आदेश काढताना ज्या कार्यालयातून कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, त्या कार्यालयाला आणि ज्या कार्यालयात बदली झाली त्या कार्यालयाला बदलीच्या आदेशाची प्रतच देण्यात आली नाही.बदली केल्यानंतर आदेशाची प्रत किंवा पत्र दोन्ही संबंधित विभागांना देणे आवश्यक असते, मात्र तसे न करता परस्पर बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे एप्रिलमध्ये बदली आदेश काढल्यानंतरही हे कर्मचारी अद्याप कामावर रुजू होऊ शकलेले नाहीत. संबंधित विभागांना बदलीच्या आदेशाची प्रतच मिळाली नसल्याने त्या विभागातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यास तयार नाहीत. १५ जूनपासून रुजू करून घेण्याचा प्रयत्नयासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना विचारले असता, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करण्यात आली आहे. योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र आता १५ जूनपासून विनंती बदलीचे कर्मचारी कामावर रुजू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.