शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

ऊस दरावरून होणारा संघर्ष दुर्दैवी

By admin | Updated: November 13, 2014 00:02 IST

वसंत भोसले : राजारामबापू कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

इस्लामपूर : ऊस दरावरून शेतकरी आणि साखर कारखानदार नायक-खलनायकाच्या भूमिकेत वावरत आहेत. त्यामुळे ऊस दरावरून होणारा संघर्ष दुर्दैवी असून, सहकार चळवळ आणि कारखानदारीच्या हितासाठी कारखानदार व शेतकऱ्यांनी एकत्र बसून तोडगा काढला पाहिजे. साखर कारखानदारीतील सहकाराचे द्रष्टेपण जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू उद्योग समूहाने आदर्शपणे जोपासले आहे, असे गौरवोद्गार ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी आज (बुधवारी) काढले.राजारामबापू कारखान्याच्या साखराळे (ता. वाळवा) येथील मुख्य शाखेच्या ४५ व्या आणि वाटेगाव-सुरुल शाखेच्या १२ व्या गळीत हंगामाची सुरुवात भोसले यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत भोसले बोलत होते. ज्येष्ठ नेते रामराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. भोसले म्हणाले की, जयंत पाटील यांचे नेतृत्व लांब पल्ल्याचे आहे, हे त्यांच्या पदार्पणातील काही दिवसातच स्पष्ट झाले. त्याची प्रचिती आज येत आहे. सध्याची साखर कारखानदारी अडचणीत आहे. शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. देश-राज्यात सत्तांतर झाले आहे. अशावेळी सहकार चळवळीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे. उसाचा उत्पादन खर्च, उसापासून साखर निर्मितीचा उत्पादन खर्च, उपपदार्थ निर्मितीचा खर्च याचा ताळमेळ बसला नाही, हे खेदाने नमूद करावे लागेल. ते म्हणाले की, राजारामबापू कारखान्याने आर्थिक शिस्त पाळून काम केल्याने तो प्रगतीपथावर आहे. त्यांनी केलेला शाखाविस्तार कौतुकास्पद आहे. शासनाने तोट्यातील साखर कारखाने ‘राजारामबापू’सारख्या चांगल्या कारखान्यांकडे देण्याची भूमिका घेतली पाहिजे.कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, बाजारात साखरेचे दर कमी होत आहेत. साखर विकूनही बँकेचे कर्ज भागत नाही. काही कारखाने शॉर्ट मार्जीनमध्ये आहेत. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारीला केंद्र व राज्य शासनाने मदत करण्याची भूमिका घ्यायला हवी. साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी व जत शाखेत एकूण २५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.संचालक बाळासाहेब पवार यांनी आभार मानले, डी. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपाध्यक्ष विजय पाटील, जनार्दनकाका पाटील, विष्णुपंत शिंदे, जे. वाय. पाटील, प्रा. शामराव पाटील, नेताजीराव पाटील, देवराज पाटील, बी. के. पाटील, डॉ. प्रताप पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, सभापती रवींद्र बर्डे, सुहासकाका पाटील, सौ. सुश्मिता जाधव, सुवर्णा पाटील, मेघा पाटील, पद्मावती पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)साखराळे (ता. वाळवा) येथे राजारामबापू साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाची सुरुवात बुधवारी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आली. यावेळी पी. आर. पाटील, रामराव देशमुख, जनार्दनकाका पाटील, विजय पाटील उपस्थित होते.