शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

प्रकल्पग्रस्तांचा नोकरीसाठी संघर्ष

By admin | Updated: June 9, 2016 03:10 IST

हार्डेलिया केमिकल कंपनीमुळे विस्थापित झालेल्या कुकशेतमधील प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये डावलले जात आहे.

नवी मुंबई : हार्डेलिया केमिकल कंपनीमुळे विस्थापित झालेल्या कुकशेतमधील प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये डावलले जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही व्यवस्थापन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत व नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली. परंतु येथील मूळ गावे आहेत त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. परंतु कुकशेत या एकाच गावाचे स्थलांतर करावे लागले. तत्कालीन कामगार नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा केल्यानंतर कुकशेत, शिरवणे, जुईमधील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात आली. कंपनी सुरू झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कुकशेत गावचे स्थलांतर करावे लागले. पूर्ण गाव नेरूळ व सारसोळेच्यामधील भूखंडावर वसविण्यात आले. गावातील जवळपास २२ जणांना हार्डेलियामध्ये नोकरी दिली होती. यामधील काही जणांचा मृत्यू झाला आहे. नोकरीसाठी संघर्ष करावा लागलेल्या कामगारांना आता त्यांच्या वारसांसाठी संघर्षच करावा लागत आहे.कुकशेतमधील नगरसेवक सूरज पाटील यांनी हार्डेलिया व्यवस्थापनाशी वारंवार बैठका घेवून गावातील बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची मागणी केली. परंतु व्यवस्थापनाने आश्वासनांशिवाय दुसरे काहीही दिले नाही. प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा येत असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाला पत्र पाठवून प्रकल्पग्रस्त मुलांना नोकरीत सामावून घेतले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)>कुकशेत ग्रामस्थांच्या जमिनीवर व मूळ गावाच्या जागेवर कंपनी उभी राहिली आहे. कंपनीमध्ये बेरोजगार स्थानिक तरुणांना नोकरी मिळावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. परंतु कंपनी व्यवस्थापन प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेत नसल्याने कंपनीसमोर ग्रामस्थ उपोषण करणार आहेत. - सूरज पाटील,नगरसेवक