शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाची अपंगत्वावर मात!

By admin | Updated: January 2, 2015 00:51 IST

अपंगत्व ही मानसिकता आहे. त्याला चिकटून न राहता, उंच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार काबाडकष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही.

नागपूर : अपंगत्व ही मानसिकता आहे. त्याला चिकटून न राहता, उंच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार काबाडकष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जयसिंह चव्हाण होत. जयसिंह चव्हाण यांनी आपल्या अपंगत्वावर मात केली आणि आज कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. दुसऱ्याच्या मदतीशिवाय जे कधी काळी उभे राहू शकत नव्हते, ते आज शेकडो लोकांचे पालनहार बनले आहेत. जयसिंह चव्हाण हे केवळ ३६ वर्षाचे आहेत. जयसिंह हे जन्मजात अपंग नव्हते. वयाच्या दीड वर्षापर्यंत ते अगदी ठणठणीत होते. परंतु डॉक्टरने दिलेल्या एका चुकीच्या इंजेक्शनची रिअ‍ॅक्शन झाली आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत ते घराबाहेर पडले नाही. इतवारीतील घराच्या गॅलरीमधून ते लोकांना पाहत असत. लहान मुले खेळताना बघितली की त्यांनाही खेळावेसे वाटायचे परंतु इलाज नव्हता. गणेशोत्सवादरम्यान एकदा वस्तीमध्ये संगीतखुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात जयसिंह यांनीही भाग घेतला. त्यांच्या दोन्ही हात आणि अधू झालेल्या पायांमधून रक्त वाहू लागले होते. मात्र शेवटी त्यांनी ही स्पर्धा जिंकली. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. तेव्हापासून त्यांनी मागे वळू पाहिले नाही. आईने दिलेल्या २०० रुपयामधून त्यांनी कपडे धुण्याची पावडर तयार करण्याच्या कामापासून सुरुवात केली. आपल्या ट्रायसिकलवर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्याला ‘रंजना ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज’ असे आईचे नाव दिले. पाहता पाहता कोट्यावधी रुपयाची उलाढाल करणारा हा उद्योग बनला. इतरांनाही त्यांनी रोजगार दिला. ते दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनले. परंतु त्यांचा लढा इथेच संपला नाही. २०१० साली त्यांच्या कंपनीत आग लागली आणि संपूर्ण कंपनी बेचिराख झाली. अशा वेळीही खचून न जाता त्यांनी नवीन उद्योग उभारणीस सुरुवात केली आणि आॅईल रिफायनरी इंडस्ट्रीज उभी केली. बुटीबोरीतील ही कंपनी आज कोट्यवधीची उलाढाल करीत आहे. ही कंपनी आज अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत असून जयसिंह हे आयकॉन बनले आहेत.