शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सारोळा पुलाचे हवे स्ट्रक्चरल आॅडिट

By admin | Updated: August 23, 2016 01:29 IST

नीरा नदीवरील पुलाचे कठडे तोडून २०१३ साली कार नदीत पडून मोठा अपघात होऊनसुद्धा या महत्त्वाच्या पुलाकडे अजूनही प्रशासनाकडून दुरुस्तीसाठी लक्ष दिले नाही

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा (ता. भोर) येथील नीरा नदीवरील पुलाचे कठडे तोडून २०१३ साली कार नदीत पडून मोठा अपघात होऊनसुद्धा या महत्त्वाच्या पुलाकडे अजूनही प्रशासनाकडून दुरुस्तीसाठी लक्ष दिले नाही. या महामार्गावरील महत्त्वाच्या पुलावरून अजूनही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकरिता नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पुणे-सातारा महामार्गावर पुणे व सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या या नीरा नदीवरील पुलाला साधारण ५० वर्षे झाली असून, महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामध्ये या जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला नवीन पूल बांधण्यात आले आहेत. मात्र पुण्याहून साताराकडे जाणारा पूल अद्यापही अपूर्ण असल्याने साताराकडे जाणारी वाहतूक या जुन्या पुलावरुनच होते आहे. या पुलाचे कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. त्यास साधा पत्रा व लोखंडी पाइप लावून जुजबी डागडुजी करून वेळ मारून नेली आहे. यामुळे पूल धोकादायक झाला आहे. नवीन पूल बांधण्यात आल्याने या पुलाच्या देखभालीकडे प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते आहे. त्यातच या पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत, भेगा पडलेल्या आहेत. पुलाच्या सुरुवातीला उगवलेली झाडेझुडपे काढलेली नाहीत. मागील अपघातानंतर या ठिकाणी तकलादू दिशादर्शक फलक लावून प्रवाशांच्या जीविताशी खेळले जात आहे. नवीन होणारा पूल पूर्ण होईपर्यंत तरी या जुन्या पुलाचे कठडे पक्के बांधून तसेच दुरुस्तीसाठी स्ट्रक्चरल आॅडिट गरजेचे झाले आहे. महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी सुहास चिटणीस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या तज्ज्ञांच्या मते या जुन्या पुलाचे काम मजबूत असून, पुलावरील बाजूकडे काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील. नवीन पुलाचे काम संपादनाच्या काही किरकोळ अडचणींमुळे थांबले आहे, तेदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.(वार्ताहर)>कामात दुर्लक्ष : कठडे बसवण्याऐवजी केले काँक्रिटीकरणसन २०१३मध्ये या पुलावरूनच पुण्यातील चार जणांचा कार पाण्यात बेपत्ता होऊन मृत्यू झाला होता. सन २०१४ मध्ये एका ट्रकसह चालक व क्लिनर नदीच्या कोरड्या पात्रात पडले होते. एका आरामबसचा क्लिनर खाली उतरून बसचालकाला माहिती देत असताना पुलावरुन पाण्यात पडून मृत्युमुखी पडला होता. असे अनेक विविध अपघात या जुन्या पुलाच्या मोडलेल्या कठड्यांमुळे झाले आहेत. महाड घटनेनंतर महामार्गाच्या ठेकेदाराने पुलाच्या सारोळा बाजूकडील सुरवातीच्या डाव्या बाजूला खचलेला भाग सिमेंट काँक्रिटने भरुन घेतला आहे. मात्र त्या ठिकाणीदेखील कठडे नसल्याने अद्याप ती जागा धोकादायकच आहे.