शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

जिल्ह्यात निवडणुकांचे जोरदार वारे

By admin | Updated: November 2, 2016 02:42 IST

जिल्ह्यात सर्वत्र नगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.

आविष्कार देसाई,

अलिबाग- जिल्ह्यात सर्वत्र नगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून नवनवीन शक्कल लढविण्यात येत आहेत. यासाठी चक्क रामायणातील दाखले दिली जात आहेत. पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शुंगारपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्यावेळी याचा प्रत्यय आला. चोऱ्यामाऱ्या, भ्रष्टाचार करणारे भाजपामध्ये गेले की, त्यांचा वाल्मीकी होतो. इतर राजकीय पक्षात मात्र वाल्याच राहत असल्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगून उपस्थितांना धक्का दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन महाराष्ट्र’ही संकल्पनाही राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील जनतेसाठी कोणते क्रांतिकारक निर्णय घेतले, त्याचे फलित काय झाले, याची माहिती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश महेता अलिबागमध्ये दाखल झाले होते. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वरील माहिती दिली. ‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये रायगडचे योगदान, महत्त्वाबाबत महेता यांना विचारणा केली असता, याबाबत तीन महिन्यांत पुस्तिका छापणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विविध राजकीय पक्षांंमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाला उधाण आले आहे. काहीच दिवसांपूर्वी पेण नगरपालिका क्षेत्रातील विविध राजकीय नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. यात पेण अर्बन बँकेच्या सुमारे ७५० कोटी रुपयांच्या घोटाळ््यातील आरोपी संतोष शुंगारपुरे यांचाही समावेश होता. भ्रष्टाचाऱ्यांची जागा जेलमध्ये आहे, असे भाजपा ओरडून ओरडून सांगते, असे असताना शुंगारपुरेसारख्या व्यक्ती तुम्हाला कशा चालतात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा वाल्मीकी होणार असेल, तर त्यांना मदत करणार का, असे प्रश्नही मेहता यांना विचारण्यात आले. यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द होणाऱ्या कोणाचीही भाजपा गय करणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.>सांबरकुंड धरणाबाबत महेता अनभिज्ञपहिल्या पंचवार्षिक योजनेतील सांबरकुंड धरण अद्याप पूर्ण झालेले नाही. सरकार बदलले परंतु प्रश्न जैसे थे आहे. हे धरण अलिबाग तालुक्यातील रामराज येथे प्रस्तावित आहे. धरणाच्या निर्मितीबाबत प्रश्न विचारला असता, प्रकल्प कोठे आहे, प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे याची माहिती घेतो, असे मोघम उत्तर महेता यांनी दिले. सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन भूसंपादन कायद्यानुसार सुमारे ३३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई सरकारने देऊ केली आहे. हेही मेहता यांना माहित नव्हते.>मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होणारमुंबई-गोवा महामार्गाचे काम ३१ डिसेंबर २०१६ पासून सुरू होईल आणि ठरलेल्या मुदतीत पूर्ण होणार असल्याचे महेता यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्याबाबतही संबंधित विभागांना रस्ते सुस्थित करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महाड येथील सावित्री नदीवरील पूल नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यात कामाचे भूमिपूजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.