शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

जिल्ह्यात निवडणुकांचे जोरदार वारे

By admin | Updated: November 2, 2016 02:42 IST

जिल्ह्यात सर्वत्र नगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.

आविष्कार देसाई,

अलिबाग- जिल्ह्यात सर्वत्र नगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून नवनवीन शक्कल लढविण्यात येत आहेत. यासाठी चक्क रामायणातील दाखले दिली जात आहेत. पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शुंगारपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्यावेळी याचा प्रत्यय आला. चोऱ्यामाऱ्या, भ्रष्टाचार करणारे भाजपामध्ये गेले की, त्यांचा वाल्मीकी होतो. इतर राजकीय पक्षात मात्र वाल्याच राहत असल्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगून उपस्थितांना धक्का दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन महाराष्ट्र’ही संकल्पनाही राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील जनतेसाठी कोणते क्रांतिकारक निर्णय घेतले, त्याचे फलित काय झाले, याची माहिती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश महेता अलिबागमध्ये दाखल झाले होते. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वरील माहिती दिली. ‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये रायगडचे योगदान, महत्त्वाबाबत महेता यांना विचारणा केली असता, याबाबत तीन महिन्यांत पुस्तिका छापणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विविध राजकीय पक्षांंमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाला उधाण आले आहे. काहीच दिवसांपूर्वी पेण नगरपालिका क्षेत्रातील विविध राजकीय नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. यात पेण अर्बन बँकेच्या सुमारे ७५० कोटी रुपयांच्या घोटाळ््यातील आरोपी संतोष शुंगारपुरे यांचाही समावेश होता. भ्रष्टाचाऱ्यांची जागा जेलमध्ये आहे, असे भाजपा ओरडून ओरडून सांगते, असे असताना शुंगारपुरेसारख्या व्यक्ती तुम्हाला कशा चालतात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा वाल्मीकी होणार असेल, तर त्यांना मदत करणार का, असे प्रश्नही मेहता यांना विचारण्यात आले. यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द होणाऱ्या कोणाचीही भाजपा गय करणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.>सांबरकुंड धरणाबाबत महेता अनभिज्ञपहिल्या पंचवार्षिक योजनेतील सांबरकुंड धरण अद्याप पूर्ण झालेले नाही. सरकार बदलले परंतु प्रश्न जैसे थे आहे. हे धरण अलिबाग तालुक्यातील रामराज येथे प्रस्तावित आहे. धरणाच्या निर्मितीबाबत प्रश्न विचारला असता, प्रकल्प कोठे आहे, प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे याची माहिती घेतो, असे मोघम उत्तर महेता यांनी दिले. सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन भूसंपादन कायद्यानुसार सुमारे ३३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई सरकारने देऊ केली आहे. हेही मेहता यांना माहित नव्हते.>मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होणारमुंबई-गोवा महामार्गाचे काम ३१ डिसेंबर २०१६ पासून सुरू होईल आणि ठरलेल्या मुदतीत पूर्ण होणार असल्याचे महेता यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्याबाबतही संबंधित विभागांना रस्ते सुस्थित करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महाड येथील सावित्री नदीवरील पूल नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यात कामाचे भूमिपूजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.