शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

दृढ संकल्प हवा निर्सग रक्षणाचा, समृध्द वसुंधरेच्या वरदानाचा

By admin | Updated: June 5, 2015 01:44 IST

पाच जून हा दिवस संपूर्ण विश्वात जागतिक पर्यावरण दिन सोहळा म्हणून साजरा केला जातो. खरेतर, बदलत्या हवामानाची, पर्यावरणाची नोंद ५ जून १९७२ रोजी स्टॉक होम येथे घेण्यात आली.

पाच जून हा दिवस संपूर्ण विश्वात जागतिक पर्यावरण दिन सोहळा म्हणून साजरा केला जातो. खरेतर, बदलत्या हवामानाची, पर्यावरणाची नोंद ५ जून १९७२ रोजी स्टॉक होम येथे घेण्यात आली. त्या दिवसापासून ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन सोहळा म्हणून साजरा केला जाऊ लागला. म्हणजेच जवळजवळ ४३ वर्षांपूर्वी बदलत्या पर्यावरणाची नोंद मानवाने घेतली. परंतु या चार दशकांच्या वाटचालीत आपण समृद्ध पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता खरंच मनापासून प्रयत्न केले का? हा विचार करण्यासाठी या दिवसाचे औचित्य खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक पाहता वैश्विक पातळीवरच अखिल मानवजातीने विकासाच्या वाटचालीत बदलत्या पर्यावरणाचे भान राखले नाही असेच म्हणावे लागेल. आपण किमान आपल्या राज्यापुरता विचार केला तरी वर्तमानातील जीवनात गेल्या १० वर्षांत झपाट्याच्या प्रगतीने आपण मोठी महानगरे लोकसंख्येने भरून टाकली, पण त्याच्या जोडीला मानवी मूलभूत गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक संसाधने, वापरलेल्या वस्तंूचे विघटन किंवा विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना, सांडपाण्याचे शुद्धीकरण, पिण्याच्या पाण्याचे नियोजन याबाबत आपण करीत असलेले प्रयत्न निश्चितच तोकडे आहेत. त्याचे कारण बदलत्या परिस्थितीत पर्यावरणाचे व प्रदूषणाचे प्रश्न कमी होण्यासाठी नियोजनाचा अभाव व त्याला व्यापक लोकसहभागाची नितांत गरज आज अधोरेखीत होत आहे. आपण अत्यंत साध्या गोष्टींकडे लक्ष वेधू. किमानपक्षी आपण केवळ स्वच्छतेचा जरी विचार केला तरी ती स्वच्छता अंगी बाणविणे हे आपल्या प्रत्येकाचे अंगीभूत कर्तव्य असणे आवश्यक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात भारताच्या स्वच्छतेबाबत केलेले भाष्य आणि त्यावर स्वच्छ भारत अभियानाची घोषणा निश्चितच गौरवास्पद म्हणायला हवी. आज स्वच्छतेची समस्या ही केवळ मोठ्या शहरांपूर्तीच मर्यादित नसून हा प्रश्न छोटी, मध्यम शहरे, ग्रामीण विभाग यांनादेखील भेडसावतो आहे. याला कारण आपली न बदललेली मानसिकता. पर्यावरणाचे दिन साजरे करताना एखादा संकल्प घेऊन आपण वर्षभर काम करणे आवश्यक आहे. या वर्षीच्या पर्यावरण दिनी किमान स्वच्छतेचा संकल्प करून आपण पुढील वर्षभरात स्वच्छ भारताची मोहीम हाती घेतली तरी यातून निश्चितच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण याकरिता दृढ संकल्पाची नितांत गरज आहे. स्वच्छ घर, स्वच्छ गाव, स्वच्छ शहर, स्वच्छ राज्य, तरच स्वच्छ व निर्मळ राष्ट्र निर्माण करणे १२0 कोटी जनतेला सहज शक्य आहे. स्वच्छतेबरोबरच दुसरा महत्त्वाचा प्रश्न प्लॅस्टिक पिशव्यांचा. या प्रश्नाविषयी शासकीय स्तरावर अनेक कडक उपाययोजना, कायदे अस्तित्वात आहेत. पण जोपर्यंत लोकसहभागाची साथ मिळत नाही तोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर सहज साध्य होणार नाही. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबई शहरातील प्लॅस्टिक पिशव्या निर्मूलनासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. याकरिता ५0 मायक्रॉनच्या खाली प्लॅस्टिक पिशवी उत्पादकांवर कायदेशीर कारवाईचा दंडुका उगारल्यानंतर हे उत्पादक नामोहरम झाले आहेत. परंतु रामदास कदम यांनी उचललेल्या या धडक मोहिमेला लोकसहभागानेदेखील तितकीच मदत करणे आवश्यक आहे. शेवटी मंत्रिमंडळात काम करणारे मुख्यमंत्री, मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी हेदेखील समाजात राहणारे एक नागरिकच आहेत. आपण सर्वसामान्य नागरिक मात्र प्रत्येक गोष्ट शासनाने केली पाहिजे असे म्हणत आपला व्यक्तिगत सहभाग टाळत असतो. हा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा हाच खरा प्रश्न आहे. उदा. आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाचेच घेऊ या. जेव्हा मैदानात संघातील ११ खेळाडू सांघिक भावनेतून जिंकण्याचे एकच लक्ष्य ठेवून खेळतात तेव्हा तो संघ समोरच्या संघाला निश्चितच पराभूत करतो. पण त्याच संघातील ११ खेळाडूंनी जिंकण्याचे एकच लक्ष्य न ठेवता खेळ खेळला तर त्यांचा पराभव निश्चित ठरलेला असतो. त्याचप्रमाणे शासनाने पर्यावरण रक्षणासाठी निर्माण केलेले कायदे हे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन समाधानकारक व्यतीत व्हावे या उद्देशानेच या कायद्यांची तरतूद करण्यात आलेली असते. पण या कायद्यांची अंमलबजावणी करण्याकरिता प्रामाणिकपणे, कसोशीने व राष्ट्रीयत्वाच्या भावनेने प्रयत्न केल्यास पर्यावरण व प्रदूषणाचे प्रश्न सहज सोडविता येतील. भारत हा देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे आपण नेहमी म्हणतो. पण या वाटचालीत आपण इथल्या मातीवर, निसर्गावर, नैसर्गिक संसाधनांवर, पाण्याच्या नियोजनावर जोपर्यंत मनस्वी प्रेम करीत नाही तोपर्यंत भारत महासत्ता होईल पण त्याच्यासोबत अनेक प्रश्नांनी त्याला घेरलेले असेल. याकरिता आपले राष्ट्रीयत्व म्हणजे आपल्या घराबरोबरच आपल्या सभोवतालची स्वच्छता, निसर्गाला हानी पोहोचेल अशा वस्तूंचा वापर टाळणे, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि निसर्गाची पूजा हीच मानवाची पूजा अशी जीवनशैली अंगीकारल्यानंतर आपण केवळ महासत्ता नव्हे, तर जगावर राज्य करू शकतो; कारण आपल्या देशाची प्राचीन संस्कृती, परंपरा, पराक्र म, इतिहास, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य चळवळ ही आपली बलस्थाने आहेत हे आपण विसरता कामा नये. जे राष्ट्र इतिहासाला साक्षी ठेवून वर्तमानात भविष्याचा सकारात्मक वेध घेते, तेच राष्ट्र उज्ज्वल पिढीची मुहूर्तमेढ वर्तमानात रु जवत असते. म्हणून प्रश्न पर्यावरणाचा असो किंवा प्रदूषण नियंत्रणाचा याबद्दल वैचारिक मंथन केवळ जागतिक पर्यावरण दिनी न करता तो आपला दैनंदिन, वार्षिक दृढ संकल्प हवा निर्सग रक्षणाचा, समृध्द वसुंधरेच्या वरदानाचा. संजय भुस्कुटे