शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कडक अंमलबजावणी होणार

By admin | Updated: December 29, 2016 03:59 IST

लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्याची मागणी केलेली असताना, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी या कायद्याची

- यदु जोशी, मुंबई

लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्याची मागणी केलेली असताना, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यासाठी प्रत्येक उपविभागीय अधिकारी पातळीवर (एसडीओ) दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्याचेही फर्मान काढले.अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती असायची. आता प्रत्येक उपविभागीय अधिकारी पातळीवर (साधारणत: दोन तालुके मिळून) एक समिती असेल. उपविभागीय अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील. पोलीस उपअधीक्षक, सर्व तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अनुसूचित जाती-जमातीचे दोन सामाजिक कार्यकर्ते, अनुसूचित जाती-जमातीचे अशासकीय संस्थांचे दोन सामाजिक कार्यकर्ते आणि केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेले तीन सामाजिक कार्यकर्ते या समितीमध्ये असतील. अशा समित्या स्थापन करण्याची अधिसूचना ८ नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने काढली होती. राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असते. मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेतअ‍ॅट्रॉसिटीचा कायदा शिथिल केला जाणार नाही, उलट त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात स्पष्ट केली होती. अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर रोखण्यासाठी खुल्या प्रवर्गातील प्रतिनिधींनादेखील या समित्यांमध्ये शासनाने स्थान द्यायला हवे होते. अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जामीनच न मिळणे हा अन्याय दूर व्हायला हवा, तसेच गंभीर गुन्ह्यात पीडितांना लगेच नुकसानभरपाई देणे हे न्याय्य आहे, पण किरकोळ तक्रार झाली, तरी नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदीने कायद्याचा गैरवापर वाढतो. हे रोखायला हवे. या सगळ्यांबाबत शासनाने काहीही केलेले नाही. - राजेंद्र कोंढारे, सरचिटणीस, अ.भा.मराठा महासंघ. उपविभागीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. फक्त समित्या कागदावर राहता कामा नयेत, तसेच त्यावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करताना, सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भरणा नसावा. प्रत्यक्ष दलित, आदिवासींमध्ये काम करणारे लोक असावेत. - कॉ. गणपत भिसे, परभणीतील आक्रोश मोर्चाचे नेते.