शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कडक अंमलबजावणी होणार

By admin | Updated: December 29, 2016 03:59 IST

लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्याची मागणी केलेली असताना, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी या कायद्याची

- यदु जोशी, मुंबई

लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्याची मागणी केलेली असताना, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यासाठी प्रत्येक उपविभागीय अधिकारी पातळीवर (एसडीओ) दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्याचेही फर्मान काढले.अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती असायची. आता प्रत्येक उपविभागीय अधिकारी पातळीवर (साधारणत: दोन तालुके मिळून) एक समिती असेल. उपविभागीय अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील. पोलीस उपअधीक्षक, सर्व तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अनुसूचित जाती-जमातीचे दोन सामाजिक कार्यकर्ते, अनुसूचित जाती-जमातीचे अशासकीय संस्थांचे दोन सामाजिक कार्यकर्ते आणि केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेले तीन सामाजिक कार्यकर्ते या समितीमध्ये असतील. अशा समित्या स्थापन करण्याची अधिसूचना ८ नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने काढली होती. राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असते. मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेतअ‍ॅट्रॉसिटीचा कायदा शिथिल केला जाणार नाही, उलट त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात स्पष्ट केली होती. अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर रोखण्यासाठी खुल्या प्रवर्गातील प्रतिनिधींनादेखील या समित्यांमध्ये शासनाने स्थान द्यायला हवे होते. अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जामीनच न मिळणे हा अन्याय दूर व्हायला हवा, तसेच गंभीर गुन्ह्यात पीडितांना लगेच नुकसानभरपाई देणे हे न्याय्य आहे, पण किरकोळ तक्रार झाली, तरी नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदीने कायद्याचा गैरवापर वाढतो. हे रोखायला हवे. या सगळ्यांबाबत शासनाने काहीही केलेले नाही. - राजेंद्र कोंढारे, सरचिटणीस, अ.भा.मराठा महासंघ. उपविभागीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. फक्त समित्या कागदावर राहता कामा नयेत, तसेच त्यावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करताना, सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भरणा नसावा. प्रत्यक्ष दलित, आदिवासींमध्ये काम करणारे लोक असावेत. - कॉ. गणपत भिसे, परभणीतील आक्रोश मोर्चाचे नेते.