शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये धक्काबुक्की

By admin | Updated: August 30, 2016 23:37 IST

वाहतूक पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात आज सकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - वाहतूक पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात आज सकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला. सीताबर्डी ठाण्यात दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप आणि तक्रारीचा पवित्रा घेतला गेला. नंतर मात्र वरिष्ठ अधिकारी आणि आॅटो युनियनच्या नेत्यांनी समंजसपणा दाखवल्याने प्रकरण निवळले.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सोमवारी सायंकाळी वाहतूक शाखेच्या अधिका-यांना उपराजधानीतील विस्कळीत वाहतूक रस्त्यावर आणण्याचे तसेच संबंधित प्रशासनाला रस्त्यावरचे अतिक्रमण हटविण्याचे कडक शब्दात निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर, वाहतूक शाखेतर्फे मंगळवारी सकाळपासून शहरातील विविध भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर धडक कारवाईची मोहिम पोलिसांनी सुरू केली.रेल्वेस्थानकासमोरच्या जयस्तंभ चौकात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होती. त्यामुळे या भागात घुटमळणा-या आॅटोचालकांनाही हुसकावले जात होते. तेवढ्यात प्री पेड आॅटोचालक संघटनेचे पदाधिकारी अल्ताफ अंसारी आॅटो घेऊन चौकातून जात होते. पेट्रोल कमी झाल्यामुळे (रिजर्व लागल्यामुळे) चौकात आॅटो बंद पडला. ते माहित नसल्याने आॅटोचालकांना तेथून दूर करीत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई मुकेश कनाटे यांनी दोन - तीन वेळा त्यांना तेथून लवकर निघा, लवकर निघा, असे आवाज दिले. यातून कनाटे आणि अंसारी यांच्यात बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्की झाली. ते पाहून अन्य आॅटोचालकांनी तेथे गोंधळ घालत रस्ता रोको सुरू केला. ही माहिती कळताच राष्ट्रवादी आॅटो यूनियनचे अध्यक्ष तसेच राकांपाचे माजी शहराध्यक्ष अजय पाटील, नगरसेविका प्रगती पाटील, अन्य एका संघटनेचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्यासह मोठ्या संख्येत आॅटोचालकांनी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करून धमकावणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली अंसारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला. तर, विनाकारण मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप करीत कनाटेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आॅटोचालक संघटनांच्या नेत्यांनी लावून धरली. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण बनले. शेवटी ठाणेदार सत्यवीर बंडीवार आणि अजय पाटील यांनी दोन्हीकडील मंडळींना शांत केले. दोघांनीही एकमेकांशी हातमिळवत कोणतीही तक्रार न देण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण शांत झाले. सोमवारी सायंकाळी पत्रकारांनी शहरातील बेशिस्त आॅटोचालक आणि बिघडलेल्या वाहतूकीच्या मुद्याची पोलीस आयुक्तांना माहिती दिली. आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी त्याची दखल घेत तासाभरानंतरच कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, शहरात विना सायलेंसरच्या बुलेट चालवून फटाके फोडणा-या बुलेटचालकांवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. अनेक बुलेट चालकांची तपासणी करतानाच वाहतूक पोलिसांनी १२ बुलेट ताब्यातही घेतल्या. मंगळवारी सकाळपासून १०० पेक्षा जास्त बेशिस्त वाहनचालक, आॅटो आणि स्कूल बसचालकांवर कारवाई करण्यात आली.