शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमधील बंधाऱ्यांवर ढापे टाका

By admin | Updated: November 5, 2016 01:19 IST

दौंडच्या पूर्व भागातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, पेडगाव येथील भीमा नदीपात्रावर असणाऱ्या बहुतांश बंधाऱ्यांना अद्याप ढापे बसवलेले नाहीत.

देऊळगावराजे : दौंडच्या पूर्व भागातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, पेडगाव येथील भीमा नदीपात्रावर असणाऱ्या बहुतांश बंधाऱ्यांना अद्याप ढापे बसवलेले नाहीत. त्यामुळे बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, आगामी रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी कमी पडण्याची भीती शेतकरीवर्गातून पुढे येत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू झाल्यानंतर संबंधित विभागाच्या वतीने दौंडच्या पूर्व भागातील बंधाऱ्यांवर ढापे बसविणे, जीर्ण ढापे काढून त्याजागी नवीन ढापे बसविणे यांसह अन्य कामे केली जातात. त्यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा बंधाऱ्यात उपलब्ध होत असतो. तर, या वर्षी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने भीमा नदीपात्रात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा आहे; परंतु शासनाने चालू वर्षी या भागातील काही बंधाऱ्यांवर ढापे टाकले नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. समाधानकारक पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्य नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केलेली आहे. तर, रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका याचबरोबर जनावरांना हिरवा चाऱ्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. गेल्या वर्षी पाऊस कमी पडला; त्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. शेतीला ऐन उन्हाळ्यात पाणी मिळाले नाही, पिके पाण्याअभावी जळून गेली. पूर्व भागातील गावासाठी भामा-आसखेडचे पाणी सोडण्यात आले; पण ते दौंडच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. यामुळे जास्त नुकसान या परिसरातील गावांचे झाले. आतापर्यंत बंधाऱ्याचे ढापे बसावण्याची गरज आहे. तेव्हा पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष घालून ढापे टाकण्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. >लवकरच कामाला सुरुवात करणारयाबाबत खडकवासला पाटबंधारे दौंड उपविभागाचे सहायक अभियंता सुहास साळुंके म्हणाले, की संबंधितांना याबाबत सूचना दिल्या असून लवकरच कामकाजाला सुरुवात होईल. दौंडच्या पूर्व भागातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, पेडगाव येथील भीमा नदीपात्रावरील बहुतांश बंधाऱ्याला अद्याप ढापे बसवलेले नाहीत.