शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खोटे कॉल्स करणाऱ्यांवर होणार आता कठोर कारवाई

By admin | Updated: February 24, 2016 01:23 IST

‘मी राधेशाम बोलतोय. दादरला बॉम्ब ठेवला आहे.’ पनवेलला दोन किशोरवयीन मुलांनी १०० क्रमांकावरील फोन फुकटात असल्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.

- डिप्पी वांकाणी,  मुंबईघटना पहिली : ‘मी राधेशाम बोलतोय. दादरला बॉम्ब ठेवला आहे.’ पनवेलला दोन किशोरवयीन मुलांनी १०० क्रमांकावरील फोन फुकटात असल्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.घटना दुसरी : दुबईहून हाफीज रेहमान याने मुंब्य्रात राहणाऱ्या नदीम-श्रावण शेख याने चार जिहादींना घरात आश्रय दिल्याचे पोलिसांना फोन करून सांगितले. कारण काय, तर नदीम-श्रावणच्या चुलत बहिणीशी हाफीज रेहमानच्या लग्नाला त्याचा विरोध होता.तिसरी घटना : पुणे येथील संजीब मिश्र याची पोलिसांनी नाकाबंदीमध्ये झडती घेतली होती, म्हणून त्याने ओडिशाहून येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा गंमत म्हणून फोन केला.२०१५ वर्षात आजपर्यंत दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अशा स्वरूपाचे १४८ फोन (कॉल्स) आले. त्यातील ९० टक्के हे गंमत म्हणून केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलीस यंत्रणेचे अगणित मनुष्यतास वाया गेले. लक्षावधी प्रवाशांची गैरसोय झाली. हा सगळा अनुभव घेतल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी झाले तेवढे पुरे झाले, असे समजून खोटे फोन करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. असे फोन करणाऱ्यांना सहज जामीन मिळतो आणि काहीही शिक्षा होत नाही. त्यामुळे पोलिसांनी असे कॉल्स करण्याचा गुन्हा हा अजामीनपात्र असावा आणि अपराध्याला काही वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व्हावी, अशी दुरुस्ती भारतीय दंड संहितेमध्ये करण्याची शिफारस केली आहे. ‘सध्याच्या कायद्यानुसार, असे फसवे कॉल्स करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेचे कलम ५०५ (२) नुसार गुन्हा नोंदविला जातो, परंतु त्याला अगदी सहज जामीन मिळतो व त्याला क्वचितच शिक्षा होते. सध्याच्या कायद्यानुसार, या गुन्हेगाराला जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरुंगवासाची व दंडाची शिक्षा होऊ शकते. विशिष्ट रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आम्हाला कोणी केल्यास, तो आम्ही गांभीर्याने घेऊन आमची सगळी यंत्रणा त्या कामाला लावतो. लक्षावधी प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते, कारण त्यांची झडती घेतली जाते. तो फोन खोटा होता, हे शेवटी स्पष्ट होते, तेव्हा गुन्हेगाराला अटक होते, परंतु अगदी सहजपणे त्याला जामीन मिळतो,’ असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कलमांमध्ये दुरुस्तीचा विचारएटीएसचे प्रमुख विवेक फणसाळकर म्हणाले की, ‘लोक जेव्हा खरी माहिती पोलिसांना देतात, त्या वेळी ते बक्षिसास पात्र असतात, परंतु जे मुद्दाम खोटे कॉल्स करतात, त्यांच्याशी कठोरपणे वागण्याची गरज आहे. हे कॉल्स थट्टा म्हणून समजता येणार नाहीत. कारण त्यामुळे संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागते. अशा प्रकारांचा कठोरपणे बिमोड व्हावा, यासाठी संबंधित कलमांत दुरुस्तीचा विचार करीत आहोत.’