शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

विचित्र : १२ व्या वर्षी जडलेला आजार ६४ व्या वर्षी झाला बरा

By admin | Updated: April 25, 2017 17:16 IST

आजाराचे योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर त्या रुग्णाला सततच्या दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो

राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 25 - आजाराचे योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर त्या रुग्णाला सततच्या दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना वसई येथील ६४ वर्षीय मेरी पीटर यांच्या बाबतीत घडली. वयाच्या बाराव्या वर्षांपासून त्यांच्या उजव्या पायामध्ये एक छोटीशी जखम होऊन त्यातून सतत रक्तमिश्रित स्त्राव होत होता. अनेकदा उपचार करुनही तो बरा होत नसल्याने अखेर त्यांच्यावर मीरारोड येथे नुकतीच यशस्त्री शस्त्रक्रिया झाल्याने त्या पूर्णपणे बऱ्या झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे अस्थिव्यंग तज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांनी सांगितले. मेरी यांना १२ व्या वर्षी त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली होती. त्याचे नेमके निदान न झाल्याने त्यावर तात्पुरता उपचार होत होता. उपचारातील तीव्रता कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या पायातील जखमेतून रक्तमिश्रित स्त्राव होत होता. सततच्या तात्पुरत्या उपचारात त्यांच्या पायावर गेल्या ५० वर्षांत तब्बल १०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ६२ व्या वर्षांनंतरही मेरी यांना नेहमीचा आजार त्रासदायक ठरू लागला. या आजारामुळे त्यांचे कुटुंबासोबत घराबाहेर जाणेही बंद झाले. त्यातच त्यांच्या सततच्या आजाराला कुटुंबही कंटाळले होते. दरम्यान त्यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालय गाठले. त्यांनी अस्थिव्यंग तज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांची भेट घेत त्यांना आपल्या आईच्या आजाराची माहिती दिली. यानंतर मेरी यांना काही दिवसांपुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. तसेच रक्ताचे काही नमुने तपासण्यात आले. त्यांत मेरी यांच्या उजव्या मांडीच्या हाडांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याचे निदान झाले. त्याला वैद्यकीय भाषेत ओस्टोटॉमी म्हटले जाते. डॉ. अग्रवाल यांनी मेरी यांच्या पायावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या मांडीच्या हाडामध्ये अँटीबॉयोटिक लेन्ड सिमेंट रॉड बसविण्यात आला. या प्रक्रियेला कॉर्टिकल विंडो प्रोसेस संबोधले जाते. त्यांच्या पायातुन रक्तस्राव थांबल्यानंतर त्यांच्या मांडीत बसविण्यात आलेला रॉड नुकताच काढण्यात आला. यानंतर मेरी यांचा आजार पूर्णपणे बरा झाल्याचे डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले. याबाबत माहिती देताना डॉ. निखिल अग्रवाल म्हणाले, लहानपणी शरीराला झालेल्या कोणत्याही जखमेवर त्वरित व पूर्णपणे उपचार करणे फार गरजेचे असते. अपूर्ण व चुकीचा उपचार रुग्णाला आयुष्यभर सतावत राहतो. ग्रामीण भागात अशा प्रकारचे अनेक रुग्ण आढळून येतात. ६४ वर्षीय मेरी यांच्यावरही अचूक निदान न झाल्यामुळे गेल्या पन्नास वर्षात त्यांच्यावर अनेक चुकीच्या शस्रक्रिया झाल्या. अशा घटना टाळण्यासाठी वेळेत योग्य व पुर्ण उपचार करणे, हाच एकमेव उपाय आहे.