शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र : १२ व्या वर्षी जडलेला आजार ६४ व्या वर्षी झाला बरा

By admin | Updated: April 25, 2017 17:16 IST

आजाराचे योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर त्या रुग्णाला सततच्या दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो

राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 25 - आजाराचे योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर त्या रुग्णाला सततच्या दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना वसई येथील ६४ वर्षीय मेरी पीटर यांच्या बाबतीत घडली. वयाच्या बाराव्या वर्षांपासून त्यांच्या उजव्या पायामध्ये एक छोटीशी जखम होऊन त्यातून सतत रक्तमिश्रित स्त्राव होत होता. अनेकदा उपचार करुनही तो बरा होत नसल्याने अखेर त्यांच्यावर मीरारोड येथे नुकतीच यशस्त्री शस्त्रक्रिया झाल्याने त्या पूर्णपणे बऱ्या झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे अस्थिव्यंग तज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांनी सांगितले. मेरी यांना १२ व्या वर्षी त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली होती. त्याचे नेमके निदान न झाल्याने त्यावर तात्पुरता उपचार होत होता. उपचारातील तीव्रता कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या पायातील जखमेतून रक्तमिश्रित स्त्राव होत होता. सततच्या तात्पुरत्या उपचारात त्यांच्या पायावर गेल्या ५० वर्षांत तब्बल १०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ६२ व्या वर्षांनंतरही मेरी यांना नेहमीचा आजार त्रासदायक ठरू लागला. या आजारामुळे त्यांचे कुटुंबासोबत घराबाहेर जाणेही बंद झाले. त्यातच त्यांच्या सततच्या आजाराला कुटुंबही कंटाळले होते. दरम्यान त्यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालय गाठले. त्यांनी अस्थिव्यंग तज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांची भेट घेत त्यांना आपल्या आईच्या आजाराची माहिती दिली. यानंतर मेरी यांना काही दिवसांपुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. तसेच रक्ताचे काही नमुने तपासण्यात आले. त्यांत मेरी यांच्या उजव्या मांडीच्या हाडांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याचे निदान झाले. त्याला वैद्यकीय भाषेत ओस्टोटॉमी म्हटले जाते. डॉ. अग्रवाल यांनी मेरी यांच्या पायावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या मांडीच्या हाडामध्ये अँटीबॉयोटिक लेन्ड सिमेंट रॉड बसविण्यात आला. या प्रक्रियेला कॉर्टिकल विंडो प्रोसेस संबोधले जाते. त्यांच्या पायातुन रक्तस्राव थांबल्यानंतर त्यांच्या मांडीत बसविण्यात आलेला रॉड नुकताच काढण्यात आला. यानंतर मेरी यांचा आजार पूर्णपणे बरा झाल्याचे डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले. याबाबत माहिती देताना डॉ. निखिल अग्रवाल म्हणाले, लहानपणी शरीराला झालेल्या कोणत्याही जखमेवर त्वरित व पूर्णपणे उपचार करणे फार गरजेचे असते. अपूर्ण व चुकीचा उपचार रुग्णाला आयुष्यभर सतावत राहतो. ग्रामीण भागात अशा प्रकारचे अनेक रुग्ण आढळून येतात. ६४ वर्षीय मेरी यांच्यावरही अचूक निदान न झाल्यामुळे गेल्या पन्नास वर्षात त्यांच्यावर अनेक चुकीच्या शस्रक्रिया झाल्या. अशा घटना टाळण्यासाठी वेळेत योग्य व पुर्ण उपचार करणे, हाच एकमेव उपाय आहे.