शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रावसाहेब दानवेंच्या विधानांवरुन वादळ

By admin | Updated: January 21, 2017 21:22 IST

1000, 500च्या जुन्या नोटा मला आणून द्या. मी बदलून देतो,गेल्या वर्षी राज्यात दुष्काळ नव्हता. आम्ही ओरड केल्यामुळे मदत मिळाली, अशी विधाने रावसाहेब दानवे यांनी केल्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीचा आरोप

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 21 -  तुम्ही एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा मला आणून द्या. त्या मी बदलून देतो तसेच गेल्या वर्षी राज्यात दुष्काळ नव्हता. आम्ही ओरड केल्यामुळे मदत मिळाली, अशी विधाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्याचा आरोप करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी त्यांच्यावर सडकून टीका सुरू केली. चिखलीतील जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
 
 
त्यानंतर वृत्तवाहिन्यांनी माझ्या भाषणातील काही विधाने मोडतोड करून सांगितली आणि माझ्या विधानांचा विपर्यास करून दाखविला, असे दानवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपण चिखली येथील सभेत दुष्काळ आणि ५00 तसेच एक हजार रुपयांच्या नोटांविषयी काही विधाने केली होती. मात्र ती तशीच्या तशी न मांडता त्यांचा विपर्यास करण्यात आला आणि त्यामुळे अनर्थ घडला, असेही खा. दानवे यांनी बोलून दाखवले. ते म्हणाले की, माझ्या विधानांचा विपर्यास करण्यात आला. तसेच, मी जे काही बोललो, ते पूर्ण न दाखवता मोडून तोडून दाखविल्याने गैरसमज होत आहेत. गेल्या वर्षी दुष्काळच नव्हता असे मी कसे म्हणेन? कापसाला केंद्र सरकारने मदत दिली नव्हती. 
 
 
कारण महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन वाढले, असे केंद्राचे म्हणणे असल्याने त्यांनी दुष्काळाचे निकष कापूस पिकासाठी लावले नाहीत. राज्य सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या तिजोरीतून मदत दिली, असे मी सभेत बोललो होतो. नोटा बदलून देण्याच्या विधानाचा खुलासा करताना ते म्हणाले की, एक हजार, पाचशेच्या नोटा मी कशा बदलून देणार? ग्रामीण भागातील जनतेसमोर बोलताना एक वेगळा बाज असतो, त्यांच्याशी संवाद केल्यासारखे भाषण करावे लागते. तसे करताना मी केलेल्या विधानांचे विरोधकांनी भांडवल करावे, याचे मला आश्चर्य वाटते. 
 
 
दुष्काळी जनतेची कसली गंमत करता? - धनंजय मुंडे 
रावसाहेब दानवे यांच्यावर टीका मुंबई : राज्यात दुष्काळच नव्हता, असे आम्ही ओरडून सांगितले म्हणून मदत मिळाली, हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. आता दानवे हे मी गमतीने बोललो, असे म्हणत असले तरी प्रदेशाध्यक्षपद भूषविणारी व्यक्ती अशा विषयात गंमत कशी काय करू शकते असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी केला. हे विधान म्हणजे राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेची चेष्टा करणारे आहे. दुष्काळ जाहीर करा, यासाठी आंदोलने झाली. विधिमंडळाची दोन्ही सभागृहे अनेक दिवस बंद पडली. न्यायालयालाही दुष्काळ जाहीर करा, हे सांगावे लागले. तरीही दानवेंना गंमत सुचत असेल तर हे राज्याचे व शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. दानवे सध्या दुष्काळ नाही म्हणतात, उद्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत, असे म्हणायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत, अशी टीकाही मुंडे यांनी केली.
 
 
ईडीमार्फत चौकशीची काँग्रेसची मागणी
चलनातून बाद केलेल्या नोटा मला द्या, मी त्या बदलून नव्या नोटा देतो, असे सांगणाऱ्या रावसाहेब दानवे यांना तात्काळ अटक करून त्यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंत म्हणाले, राज्यभरात नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा सूत्रधार कोण आहे? हे दानवे यांनी बुलडाणा येथे जाहीर सभेत सांगितले आहे. दानवे हे भाजपाचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य असल्याने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन सरकारने त्यांना तात्काळ अटक करावी आणि दानवे आणि प्रदेश भाजपाच्या गेल्या सहा महिन्यांतील सर्व व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी. नगरपालिका निवडणुकीत रावसाहेब दानवे लक्ष्मीदर्शनाबाबत बोलत होते. ते याच जोरावर हे आता स्पष्ट झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांशी संबंधित बँकांच्या गाड्यातून कोट्यवधींच्या जुन्या आणि नव्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. दानवे यांनी नोटा बदलून देण्याबाबतची जाहीर कबुली दिल्याने भाजपाचे इतर नेतेही या नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा भाग आहेत असे दिसते, असेही सावंत म्हणाले. (प्रतिनिधी)