शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

वादळाचा प्रवास!

By admin | Updated: May 18, 2014 00:34 IST

‘हम बदला नही चाहते, हम बदलाव चाहते है’ अशी विचारसरणी ठेवणारे नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी भारताच्या लोकशाहीत इतिहासाचे नवीन पान रचले आहे.

‘हम बदला नही चाहते, हम बदलाव चाहते है’ अशी विचारसरणी ठेवणारे नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी भारताच्या लोकशाहीत इतिहासाचे नवीन पान रचले आहे. भारतातील लोकशाही किती सशक्त आणि सर्वसमावेशक आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. 2क्क्1 साली सत्तेच्या राजकारणात आलेले मोदी देशाच्या निवडणुकांचे केंद्रस्थान झाले. गुजरातमधील वाडनगर येथून निघालेले हे वादळ नवी दिल्लीतील ‘7 आरसीआर’ या पंतप्रधानांच्या निवासस्थानी लवकरच धडकेल. तो मार्ग शुक्रवारच्या निकालाने स्पष्ट झाला आहे. एका लहानशा गावातील चहाविक्रेत्याचा मुलगा आता देशाच्या पंतप्रधानपदी बसणार आहे. मोदी या नावाभोवती जसे वलय आहे तसेच टीका, वाद यांची सावलीदेखील आहे. असंख्य अडचणींचा सामना करणारे मोदी आतून प्रचंड शांत आहेत. वादळाच्या काळातून, अनंत अडीअडचणीतून ते बाहेर पडले. याचे कारण त्यांच्या आतल्या शांततेत असावे. 
 
शिस्तबद्ध एन.डी.
अभ्यासात सर्वसाधारण विद्यार्थी असलेल्या नरेंद्र मोदी यांचे शिक्षण बी.एन. हायस्कूल येथे झाले. शाळेत असताना ‘एन.डी.’ म्हणून परिचित होते. एनसीसीचे कॅडेट असल्याने सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध आयुष्य, पोहण्यातदेखील तरबेज.
 
मोदी लहानपणी वडिलांच्या चहाच्या ‘स्टॉल’वर मदत करण्यात पुढाकार घ्यायचे व वाडनगर रेल्वे स्थानकात चहा विकायचे. घरची परिस्थिती बेताचीच असतानादेखील 1965 च्या भारत-पाक युद्धादरम्यान सीमेवर जाणा:या सैनिकांना मोफत चहा देण्यात ते सर्वात पुढे होते. 
 
वयाच्या 17 व्या 
वर्षी जशोदाबेन यांच्याशी पालकांच्या आग्रहाखातर मोदी यांनी विवाह केला. परंतु ते आपल्या पत्नीसमवेत कधीही राहिले नाहीत. वयाच्या 17 व्या वर्षी कुमाऊं येथील पर्वतराजींकडे त्यांची पावले वळली.  
 
संघात सक्रिय झाल्यानंतर सुरुवातीला मोदींकडे वरिष्ठ पदाधिका:यांसाठी चहा, नाश्ता बनविण्याची जबाबदारी होती. याशिवाय 8 ते 1क् खोल्यांना झाडून साफसफाईदेखील ते करायचे. संघात असल्यापासून त्यांना पहाटे 5 वाजता उठून योगासन करण्याची सवय जडली ती कायमची. 
 
दररोज सकाळी ‘आयपॅड’वर 15 मिनिटे ते वर्तमानपत्र वाचतात. डिजिटल डायरी घेणा:या पहिल्या राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश आहे, हे विशेष. मोदी संपूर्णपणो शाकाहारी आहेत. गेल्या 
12 वर्षापासून त्यांनी एकदाही सुटी घेतलेली नाही.
 
लहानपणापासूनच मोदी यांना टापटीप राहण्याची आवड आहे. बेताचीच स्थिती असूनदेखील ते जास्त कष्ट करून चांगले कपडे विकत घ्यायचे. शॉर्ट कुर्ती हा त्यांचा सर्वात आवडता पेहराव. शिवाय ‘स्विस’ घडय़ाळे व मॉन्टब्लँक पेनदेखील आवजरून वापरतात. मोदी हे नियमितपणो लेखनदेखील करतात. ते स्वत: एक कवी असून, पर्यावरण व देशभक्तीवर त्यांनी गुजरातीमध्ये अनेक कविता लिहिल्या आहेत.
 
हुकमी एक्का
गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री असलेले अमीत शहा हे ‘टीम मोदी’ मधील सर्वाधिक विश्वासू सरदार. मोंदीचे सर्व राजकीय आखाडे त्यांच्याच मदतीने पूर्णत्वास जातात. 198क् साली सर्वप्रथम ते मोदींना भेटले. राज्य निवडणूकीच्या ‘प्लानिंग’ पासून ते सहकार क्षेत्र व गुजरात क्रिकेट असोसिएशनर्पयत सर्वच क्षेत्रत वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपाला शहांची मदत झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत मोदींच्या वाराणशीतील ऐतिहासिक विजयाचे शहा शिल्पकारच ठरले. 
 
विश्वासू सनदी अधिकारी 
गुजरातमधील सर्वात पॉवरफूल सनदी अधिकारी के. कैलाशनाथन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून सध्या कार्यरत आहेत. हे पद खास त्यांच्यासाठी मोदींनी  तयार केले. दाक्षिणात्य असलेले के. के. यांचा दक्षिणोकडील राज्यांमधील पक्षांशी समन्वय साधण्यासाही मोदी यांना उपयोग होतो.
 
कायदेशीर सल्लागार 
1985बॅचचे सनदी अधिकारी असलेले गिरीश मुमरू हे मोदींचे मुख्य सचिव असून राज्य सरकारच्या सर्व कायदेशीर बाबी सोडविण्याची कामगिरी ते करतात. गुजरात दंगलीपासून लोकायुक्तर्पयत सर्व गंभीर घटना मुमरू यांनी हाताळल्या आहेत.  मुख्यमंत्री कार्यालयात शहरी विकास व महसूल विभाग सांभाळणारे मुमरू दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. 
 
पैशांची बँक
‘काका’ म्हणून ओळखले जाणारे  सुरेंद्र पटेल गेल्या दोन दशकांपासून भाजपासाठी पैसे उभी करणारी ‘बँक’ म्हणून काम पाहतात. काकांनी निधीची मागणी केल्यास गुजरातचे उद्योजक त्यांना का? म्हणून विचारत नाहीत हे विशेष. अडवाणींच्याही जवळ असणारे काका हे भाजपाचे राज्यातील खजिनदार असून यापुढेही ते गुजरातमध्ये राहून पक्षाच्या राष्ट्रीय खर्चावर लक्ष ठेवतील. 
तरुण चेहरा
मुख्यमंत्री कार्यालयातील संयुक्त सचिव असलेले विजय नेहरा मोदींच्या टीममधील सर्वात तरूण चेहरा आहे. आयआयटी पदवीधर असलेला विजय आनंदीबेन पटेल यांच्याबरोबरच गुजरातमध्येच राहू शकतो. 
मोदींचे सल्लागार
गुजरातमधील टोरंट समुहाचे उपाध्यक्ष वी. चौटीवाले नागपूरपासून संघाशी संलग्न आहेत. विविध विषयांवर मोदी चौटीवाले यांच्याशी सल्लामसलत करतात. मोदींनी केलेल्या विनंतीमुळेच चौटीवाले यांनी दिल्लीमध्ये मोदी यांना प्रचारासाठी मदत केली होती. यापुढेही ते मोदी यांना सल्लागार म्हणूनच भूमिका बजावतील. 
 
तंत्रज्ञानातील ‘त्रिदेव’
मोदींच्या यशस्वी विकास मोहिमेत तंत्रज्ञानासाठी सर्वतोपरी मदत करणारे तीन तांत्रिक सल्लागार म्हणजे हिरेश जोशी, राजेश जैन आणि बी. जी. महेश.  मोदींची थ्रीडी मोहिम राबविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे  जोशी सीएमओ कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर राजेश जैन (मुंबई) आणि महेश (बंगळूर) हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील उद्योजक जोशी यांच्याबरोबर काम करतात. या तिघांपैकी जोशींचे दिल्ली जाणो नक्की असून जैन आणि महेशही मोदींच्या नव्या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावतील. 
 
डोळे आणि कान
दिल्लीतील गुजरात राज्याचे निवासी आयुक्त भारतलाल हे गेल्या चार वर्षापासून मोदींचे ‘डोळे आणि कान’ समजले जातात. त्यांचे विविध राजकारण्यांशी चांगले संबंध असून माध्यम आणि सरकारी अधिका:यांसमवेतही दुवा म्हणून  ते काम पाहतात. यापुढे मोदींबरोबर दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात त्यांना नियुक्ती मिळू शकते. 
संकटमोचक
‘व्हायब्रंट गुजरात’ मोहिमेच्या यशामागे सनदी अधिकारी अरविंद शर्मा यांची भूमिका महत्वाची होती. या मोहिमेतील यशामुळेच मोदींची ‘विकासपुरूष’ म्हणून ओळख झाली. उत्तर प्रदेशातील आझमगड व अलाहबाद या शहरांमध्ये शर्मा यांचा चांग़ला प्रभाव असून संकटमोचक म्हणून त्यांना ओळखले जाते. यापुढे दिल्लीत राहून पंतप्रधान कार्यालयात काम करून खासदांराशी संबधीत व इतर जबाबदा:या ते हाताळू शकतात. 
 
वंडर बॉय
अमेरिकेत शिकलेल्या अवघ्या 3क् वर्षीय प्रशांत किशोर या वंडर बॉयने अल्पावधीतच ‘टीम मोदी’ मध्ये स्थान व विश्वास मिळवला आहे. मोदींच्या मुख्यमंत्री कार्यालयात काम करण्या:या किशोरने यंदाच्या निवडणूकीत अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक प्रचाराच्या धर्तीवर प्रचार मोहिमेची आखणी करून मोदींचा विजय सोपा केला.  तसेच आयआयटी विद्याथ्र्याना त्यांच्या नोक:या सोडून मोदींच्या टीममध्ये काम करण्यासाठी मन वळविण्यामध्येही मोठी कामगिरी बजावली. राजकीय विषयांवर मोदींना सल्लागार म्हणून कामगिरी बजावणारा किशोर सहकारी पक्षांसमवेतही समन्वय साधण्यात महत्वाची भूमिका बजावतो. यापुढे ‘ब्रँड मोदी’ ची इमेज आणखी मजबूत करण्यासाठी मोदी किशोरला पंतप्रधान कार्यालयातही काम करण्याची संधी देऊ शकतात. 
 
गुरु विरुद्ध शिष्य
मोदी यांच्या प्रगतीत लालकृष्ण आडवाणी यांचा मोठा वाटा राहिला आहे. आडवाणींमुळेच मोदी यांनी भाजपात प्रवेश केला व त्यांच्याच मार्गदर्शनामुळे ते गुजरातचेदेखील मुख्यमंत्री झाले. परंतु 2क्1क् नंतर आडवाणी व मोदी यांच्यातील 3क् वर्षाच्या संबंधात दरी निर्माण व्हायला लागली.
 
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या ‘एसआयटी’ने गुजरात दंगलींच्या प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिल्यानंतर 2क्11 साली मोदी यांनी सद्भावना मिशन यात्र आयोजित केली. आपली छबी बदलावी हा प्रयत्न यामागे होता. 
 
याच काळात भ्रष्टाचाराविरुद्ध सोमनाथ येथून रथयात्र काढण्याच्या आडवाणींच्या प्रयत्नांना मोदी यांनी सहकार्य केले नाही. आडवाणी यांनी मोदींचे विरोधक नितीश कुमार यांच्या उपस्थितीत बिहारमधून यात्र काढली. अलिकडे पंतप्रधानपदावरुनही दोघांमधील संबंध ताणले गेले.