शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

सेनेची वेतनवाढ योजना रोखली

By admin | Updated: July 26, 2016 05:08 IST

महापालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वी शिवसेनेला दणक्यावर दणके बसू लागले आहेत़ मित्रपक्ष भाजपाच प्रतिस्पर्धी झाला असताना आता पालिका प्रशासनाने शिवसेनेच्या

मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वी शिवसेनेला दणक्यावर दणके बसू लागले आहेत़ मित्रपक्ष भाजपाच प्रतिस्पर्धी झाला असताना आता पालिका प्रशासनाने शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर हल्ला चढविला आहे़ मराठी विषयात एम़ ए़ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढ देण्याची पाच वर्षांपूर्वीची योजनाच आयुक्तांनी गुंडाळली आहे़ यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे़महापालिकेच्या कामकाजातील मराठी टक्का वाढविण्यासाठी मराठी विषयात एम़ ए़ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय मार्च २००९ मध्ये घेण्यात आला़ मराठीचा मुद्दा घेऊन लढणाऱ्या शिवसेनेने २०११ मध्ये ही योजना आणली़ मात्र या योजनेचा लाभ घेऊन जादा वेतनवाढ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धाच सुरू झाली़ त्यामुळे डॉक्टर, अभियंता तसेच अन्य तांत्रिक वर्गातील कर्मचारीही मराठी विषयातून पदव्युत्तर प्रशिक्षण घेऊ लागले़ याचा फटका पालिकेच्या तिजोरीला बसला़ आस्थापना खर्चामध्ये वाढ होऊ लागली़ लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून ही योजना आणण्यात आली होती़ मात्र याचा लाभ अन्यच कर्मचारी घेऊ लागले, त्यामुळे या योजनेचा पालिकेला फायदा होऊ शकला नाही़ परिणामी ही योजनाच गुंडाळण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे़ याबाबतचा अहवाल विधी समितीपुढे लवकरच मांडण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)आस्थापना खर्च वाढलाआर्थिक डोलारा मजबूत ठेवण्यासाठी आस्थापना खर्च मर्यादित ठेवणे आवश्यक असते़ कोणत्याही कंपनी अथवा सरकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा सर्वाधिक भार असतो़ आस्थापना खर्च वाढला, की त्या संस्थेचा आर्थिक कारभार डगमगतो़ आस्थापना खर्च वाढत गेल्यामुळे १५ वर्षांपूर्वी महापालिका आर्थिक संकटात आली होती़ अतिरिक्त वेतनावाढमुळे हाच परिणाम पुन्हा होऊ लागला आहे़वादळी चर्चेची शक्यतामराठी अजेंडा घेऊन आत्तापर्यंत शिवसेना लढली आहे़ ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी योजना बंद केल्यास चुकीचा संदेश जाईल, अशी भीती शिवसेनेला वाटते आहे़ त्यामुळे बुधवारी हा विषय विधी समितीपुढे आल्यानंतर त्यावर वादळी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे़शिवसेनेला फटका : ही योजना शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक होती़ पालिका प्रशासनाने ऐन निवडणुकीच्या काळात ती रद्द ठरविल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे़ कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देऊन जनतेच्या पैशांचा अपव्यय कशाला, असा उपरोधक टोला प्रशासनाने विधी समितीसमोर प्रस्तावात लगावला आहे़