शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वॉटर पार्कचा पाणीपुरवठा बंद करा

By admin | Updated: September 6, 2015 01:34 IST

राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने त्वरित बंद करावा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने केली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर केवळ गरजेपुरता करावा, यासाठी पक्षाच्या वतीने पाणीबचतीबाबत जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम वाया तर गेला आहेच, त्याचबरोबर राज्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट फोफावलेले आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यावर खबरदारी म्हणून आतापासूनच पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एकही तलाव यंदा भरलेला नाही. त्यातच मान्सूनही १५ दिवस आधीच परतीच्या प्रवासाला लागणार असल्याने मुंबईला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. ही बाब लक्षात घेता वर्षभराचा विचार करून वॉटर पार्क, मॉल्सना पुरविला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा, केवळ पिण्यासाठीच पाणी वापरले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास मोठी बचतमुंबईत गाड्या धुण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याचप्रमाणे शौचालयातील फ्लशसाठी शेकडो लीटर पाणी लागते. घरात होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास पाण्याची मोठी बचत करता येऊ शकते, याबाबत मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.