शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर पार्कचा पाणीपुरवठा बंद करा

By admin | Updated: September 6, 2015 01:34 IST

राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने त्वरित बंद करावा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने केली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर केवळ गरजेपुरता करावा, यासाठी पक्षाच्या वतीने पाणीबचतीबाबत जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम वाया तर गेला आहेच, त्याचबरोबर राज्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट फोफावलेले आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यावर खबरदारी म्हणून आतापासूनच पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एकही तलाव यंदा भरलेला नाही. त्यातच मान्सूनही १५ दिवस आधीच परतीच्या प्रवासाला लागणार असल्याने मुंबईला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. ही बाब लक्षात घेता वर्षभराचा विचार करून वॉटर पार्क, मॉल्सना पुरविला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा, केवळ पिण्यासाठीच पाणी वापरले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास मोठी बचतमुंबईत गाड्या धुण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याचप्रमाणे शौचालयातील फ्लशसाठी शेकडो लीटर पाणी लागते. घरात होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास पाण्याची मोठी बचत करता येऊ शकते, याबाबत मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.