शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

दारूमुळे होणारी बरबादी थांबवावी

By admin | Updated: April 28, 2015 01:35 IST

आम्ही दारूबंदीसाठी १९९३पासून लढा सुरू केला़ त्यानंतर दारूबंदीविषयी काही कायदे झाले, पण त्याची अंमलबजावणी होत नाही़

पारनेर (अहमदनगर) : आम्ही दारूबंदीसाठी १९९३पासून लढा सुरू केला़ त्यानंतर दारूबंदीविषयी काही कायदे झाले, पण त्याची अंमलबजावणी होत नाही़ दारूमुळे बरबाद होणारी तरुण पिढी व महिलांवरील वाढत्या अत्याचाराची किंमत मद्याद्वारे सरकारला मिळणाऱ्या ५ हजार कोटी रुपयांच्या करातून भरून निघेल का? याचा विचार होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.दारूबंदीची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर नक्कीच विचार करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अण्णा म्हणाले, राज्यात दारूविक्रीचे प्रमाण वाढल्यानेच महिलांवरील अत्याचार वाढला आहे़ अनेक ठिकाणी दारूमुळेच कायदा व सुव्यवस्था बिघडते. मात्र राज्य शासनच दारूबंदीविषयी उदासीन आहे़ दारूतून उत्पन्न वाढविण्याचे टार्गेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले जाते़ हा प्रकार धोकादायक आहे़ एकीकडे ५ हजार कोटी रुपये त्याद्वारे मिळणाऱ्या करातून मिळवायचे व दुसरीकडे दारूमुळे बरबाद होणारी तरुण पिढी व महिलांवरील अत्याचाराकडे दुर्लक्ष करायचे, असा कारभार राज्यात सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़आमच्या आंदोलनाला तब्बल आठ ते दहा वर्षांनी यश मिळून दारूबंदीचा कठोर कायदा अंमलात आला़ त्यामुळे ५० टक्के महिलांनी विरोध केल्यास गावातील दारूचे दुकान बंद करण्याचा नियम करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. ग्रामसभेतही हा अधिकार देण्यात आला, मात्र यासाठी फारसा कोणी पुढाकार घेत नाही. सरकारसुद्धा दारूबंदी कायद्याची कठोरपणे अंमलबजवाणी करीत नाही. आता तर सरकारनेच दारूबंदी प्रचार व प्रसार बंद केला आहे.