शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा व्यापार थांबवा, दर्जा सुधारा

By admin | Updated: December 18, 2014 05:22 IST

एकीकडे खासगी शाळांचे पेव फुटले आहे. शिक्षण महागले आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी शिक्षणाचा व्यापार थांबविण्याची मागणी

नागपूर : एकीकडे खासगी शाळांचे पेव फुटले आहे. शिक्षण महागले आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी शिक्षणाचा व्यापार थांबविण्याची मागणी विधानसभेत दोन दिवसीय चर्चेदरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी केली. नियम २९३ अन्वये योगेश सागर यांनी हा प्रस्ताव सादर केला. सुनील प्रभू यांनी शिक्षण क्षेत्र भांडवलदारांचा अड्डा झाल्याचे सांगत त्यावर सरकारचे नियंत्रण असावे, अशी मागणी केली. डी.पी. सावंत यांनी आरटीईची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. अ‍ॅड. पराग अळवणी यांनी दर्जेदार शिक्षण द्यायचे असेल तर एका वर्गात ३० ते ३५ विद्यार्थी असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रचलित शिक्षण पद्धत आमूलाग्र बदलण्याची, डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सिंदखेडराजा येथे महिला विद्यापीठाची, राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुणवत्तेवर आधारित शिक्षणाची गरज व्यक्त केली. राजभाऊ वाजे यांनी शिक्षणसम्राट मोठे भूखंड घेऊन बसल्याचा आरोप केला. संजय केळकर व मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाच ओळीत सांगितला जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. अबू आझमी यांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना शासकीय शाळेत शिकण्याची सक्ती करण्याची मागणी केली. आसीफ शेख यांनी उर्दू शाळा उघडण्याची मागणी केली. माधुरी मिसाळ यांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची मागणी केली. मेघा कुळकर्णी यांनी शालेय शिक्षणात कला, क्रीडा व संगीताला प्राधान्य देण्याची तर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा येथे मंजूर कम्युनिटी कॉलेज तातडीने उभारण्याची मागणी केली. शिक्षक मतदार संघ रद्द करून अंगणवाडी सेविकांना प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी प्रशांत बंब यांनी केली.