शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

जळगावात चायना मोबाईलची विक्री थांबविली

By admin | Updated: July 10, 2017 18:45 IST

भारत व चीनच्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर जळगावात नगरसेवकाकडून जनजागृतीपर पत्रकाचे वाटप; गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनने केला चायना मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प

ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.10- डोकलाम मध्ये भारतीय सैन्याने तळ ठोकल्याने चीनने भारताविरूद्ध युद्ध पुकारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ जळगावात चायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जनजागृतीपर पत्रके वाटप सुरु केले आहे. तर सोमवारी गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनने चायना कंपनीचे मोबाईल व वस्तूंची विक्री न करण्याचा संकल्प केला आहे. 
चीनकडून भारतीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण झालेला आहे. एकीकडे पाकिस्तानशी सैनिकी युती करून चीन भारताला संपवू पाहात आहे आणि दुसरीकडे जागतिक खुल्या आर्थिक धोरणाचा गैरफायदा घेऊन आपल्या स्वस्त व तकलादू वस्तू भारतीय बाजारात विक्री करीत भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहात आहे. भारतातून कमावलेल्या पैशांवर भारतासोबतच युद्धाची भाषा करण्याचे चीनचे धोरण हाणून पाडण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार मोहिम सुरू करण्याबाबत जळगावातील विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सुरु केली आहे.
जळगावात व्यापा:यांचा मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प
सोमवारी  विवेकानंद मंडळातर्फे गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनच्या पदाधिका:यांसोबत चर्चा करून चायना कंपनीचे मोबाईल व वस्तूंची विक्री न करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. व्यापा:यांनी देखील चायना कंपनीची मालकी असलेल्या मोबाईल कंपनीचे फलक उतरविले आहेत. तसेच चायना कंपनीचे मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प केला आहे. चायना वस्तूंवरील बहिष्कारासाठी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळातर्फे जनजागृतीपर पत्रक वाटप करण्यात येत आहेत. या संदर्भात मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता गोलाणी मार्केटमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे.
चिनी वस्तूंवर बहिष्कार का?
मसूद अजहरला दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात चीनने खोडा घातला. भारताच्या  सीमेतून महामागार्ची निर्मिती सुरू केली. अरुणाचल प्रदेशावर चीनचा दावा कायम आहे. सिमेवर नियमितपणे चिनी सैनिक भारतीय सैनिकांसोबत उर्मट वर्तन करत असतात. दुसरीकडे चिनी वस्तूंचे मार्केट भारतात इतके वाढलेले आहे, की त्याचा फटका अनेक भारतीय उद्योगांना बसलेला आहे.