शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

‘राजकारण्यांना साहित्यिक म्हणून नाकारणे थांबवा’

By admin | Updated: December 26, 2015 01:26 IST

राजकारणी साहित्यिक नसतात, या म्हणण्यात काही अर्थ नाही. राजकारण्यांना साहित्यिक म्हणून नाकारणे, ही दुर्गा भागवतांपासून सुरू झालेली परंपरा थांबवायला पाहिजे, असे स्पष्ट

पुणे : राजकारणी साहित्यिक नसतात, या म्हणण्यात काही अर्थ नाही. राजकारण्यांना साहित्यिक म्हणून नाकारणे, ही दुर्गा भागवतांपासून सुरू झालेली परंपरा थांबवायला पाहिजे, असे स्पष्ट मत वात्रटिकाकार आणि १५व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. समाजातील स्थित्यंतराविषयी साहित्यिकांना जाण आणि भान असावे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित १५व्या साहित्यिक कलावंत संमेलनाला शुक्रवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरुवात झाली. संमेलनाचे उद्घाटन विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. फुटाणे अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मुं. शिंदे, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्वागताध्यक्ष दिलीप बराटे, आदी या वेळी उपस्थित होते.फुटाणे म्हणाले, सोशल मीडियामुळे आजच्या काळातील पिढीची उंची वाढली आहे, पण साहित्यिक यापासून फार दूर आहेत. साहित्यिकांची आणि श्रीमंतांची मुले इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेत आहेत. गरीबांची मुले जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकत असल्याने मराठी जगविण्याची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली आहे. सद्यस्थिती पाहता वाचन संस्कृतीला प्रेरणा देण्यासाठी कलावंत साहित्यिकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. साहित्यिकांना सामाजिक भान असावे, हा मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणाले, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला. अशी मदत किती साहित्यिकांनी केली?