शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शिक्षणसेवकांवरील कारवाई थांबवा

By admin | Updated: November 6, 2014 22:00 IST

नागपूर खंडपीठ : शिक्षक आमदार रामनाथ मोते यांची मागणी

आनंद त्रिपाठी È वाटूळ -राज्यातील शासनमान्य अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील संचमान्यतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तूर्त स्थगिती दिली आहे. यामुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवणे, त्यांचे वेतन बंद करणे, शिक्षणसेवकांना घरी बसवणे ही कार्यवाही तातडीने थांबवावी व तसे आदेश राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी आग्रही मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांच्याकडे केली असल्याचे रत्नागिरी जिल्हा शिक्षक परिषदेचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले.केंद्र शासनाचा शिक्षण हक्क कायदा लागू झाल्याने संचमान्यतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात तांत्रिक बदल करण्यात आले. २०१३-१४च्या संचमान्यतेचे काम २०१४-१५च्या मध्यावर अद्याप सुरु आहे. २०१३-१४ची संचमान्यता करताना आताचे नवीन निकष पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्याने हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तांत्रिकदृष्ट्या अतिरिक्त होत आहेत. शासनाच्या या निकषांच्या आधारे शिक्षक व शिक्षणसेवक सेवेत आहेत, अशा शिक्षकांना नवीन निकषामुळे अतिरिक्त ठरवले. तीन वर्षे सेवा न झालेल्या शिक्षणसेवकांना सेवेतून बाहेर काढणे अन्यायकारक व घटनाबाह्य आहे. या सर्व शिक्षणसेवकांना संरक्षण मिळणे अपेक्षित असल्याचे मोते यांनी सांगितले.याबाबत महाराष्ट्र राज्य संस्थाचालक महामंडळ, शिक्षक परिषद व अन्य संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २९ आॅक्टोबर रोजी तूर्त स्थगिती दिली असल्याने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना जोपर्यंत आदेश प्राप्त होत नाहीत तोपर्यंत न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही होणार नाही. या संपूर्ण संचमान्यतेच्या प्रकराची व निकषाची फेरतपासणी करण्याची व आढावा घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शालेय शिक्षण सचिव भिडे यांच्याकडे मोते यांनी केली आहे.राज्यातील शासनमान्य अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील संचमान्यतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवणे, त्यांचे वेतन बंद करणे कार्यवाही थांबवावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, आमदार रामनाथ मोते यांच्या नेतृत्त्वाखालील शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली असून, न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडून काटेकोर पालन होईल तसा शासन आदेश लवकर काढला जाईल, अशी ग्वाही तावडे यांनी आमदार मोते यांना दिली.