शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
3
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
4
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
5
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
6
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
7
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
8
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
9
एमएमसी झोनच्या ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ८९ लाखांचं होतं बक्षीस; दरेकसा दलम झाला खिळखिळा
10
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
13
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
14
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
15
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
16
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
17
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
18
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
19
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
20
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
Daily Top 2Weekly Top 5

देशात आर्थिक अराजकतेची स्थिती - चव्हाण

By admin | Updated: November 18, 2016 05:29 IST

धनदांडग्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देण्यासाठी मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचा बळी देत आहे.

नांदेड : धनदांडग्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देण्यासाठी मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचा बळी देत आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोदी सरकारचा निर्णय लोकांच्या जिवावर बेतला असून, आजपर्यंत नांदेडसह राज्य व देशभरात ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मोदी सरकार आणखी किती लोकांचे बळी घेणार आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.केंद्र सरकारने कुठलीही पूर्वतयारी आणि पुरेशी पर्यायी व्यवस्था न करता नोटा चलनातून बाद केल्याने देशात आर्थिक अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. एटीएम आणि बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा आहेत. चार-चार दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नसल्याने नागरिकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.रुग्णालय जुन्या नोटा स्वीकारत नसल्याने उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत, शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. लग्नकार्ये खोळंबली आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. बँकेतून पैसे मिळत नसल्याने बाजार समित्यामधील व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आहे. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही सरकार मात्र लोकांना त्रास होऊ नये म्हणून कुठलीही तातडीची उपाययोजना केली जात नाही. नोटा बदलून घेण्याच्या गोंधळात झालेल्या सर्व मृत्यूला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. कर्जबुडव्या धनदांडग्या उद्योगपतींना कर्जमाफी देता मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही, असा सवाल खा. चव्हाण यांनी केला आहे. (प्रतिनिधी)