शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

देशात आर्थिक अराजकतेची स्थिती - चव्हाण

By admin | Updated: November 18, 2016 05:29 IST

धनदांडग्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देण्यासाठी मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचा बळी देत आहे.

नांदेड : धनदांडग्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देण्यासाठी मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचा बळी देत आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोदी सरकारचा निर्णय लोकांच्या जिवावर बेतला असून, आजपर्यंत नांदेडसह राज्य व देशभरात ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मोदी सरकार आणखी किती लोकांचे बळी घेणार आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.केंद्र सरकारने कुठलीही पूर्वतयारी आणि पुरेशी पर्यायी व्यवस्था न करता नोटा चलनातून बाद केल्याने देशात आर्थिक अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. एटीएम आणि बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा आहेत. चार-चार दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नसल्याने नागरिकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.रुग्णालय जुन्या नोटा स्वीकारत नसल्याने उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत, शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. लग्नकार्ये खोळंबली आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. बँकेतून पैसे मिळत नसल्याने बाजार समित्यामधील व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आहे. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही सरकार मात्र लोकांना त्रास होऊ नये म्हणून कुठलीही तातडीची उपाययोजना केली जात नाही. नोटा बदलून घेण्याच्या गोंधळात झालेल्या सर्व मृत्यूला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. कर्जबुडव्या धनदांडग्या उद्योगपतींना कर्जमाफी देता मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही, असा सवाल खा. चव्हाण यांनी केला आहे. (प्रतिनिधी)