शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

बैठकांचा रतीब, तरीही घोडं अडलेलं..

By admin | Updated: September 21, 2014 02:07 IST

शुक्रवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी ओम माथूर यांना केलेला फोन खणखणला आणि मागील शुक्रवारपासून बंद पडलेली शिवसेना-भाजपा युतीमधील जागावाटपाची चर्चा सुरु झाली..

शुक्रवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी ओम माथूर यांना केलेला फोन खणखणला आणि मागील शुक्रवारपासून बंद पडलेली शिवसेना-भाजपा युतीमधील जागावाटपाची चर्चा सुरु झाली.. भाजपाच्या कोअर कमिटीच्या आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकांचे रतीब सुरु राहिले.. वेगवेगळे नेते परस्परांच्या भेटीगाठी घेत राहिले. मात्र शनिवारचा सूर्यास्त होईर्पयत जागावाटपाचं घोडं अडून राहिले. 
 
अन् शिवसेनच्या प्रस्तावाने भाजपा नेते निराश
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचा फोन आला. उद्धव म्हणाले की, जागावाटपाची चर्चा सुरु करायची आहे. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांना मी आपल्या भेटीला धाडत आहे. पेडर रोड येथील ओसवाल यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे नेते पोहोचले तेव्हा काही तरी नवीन प्रस्ताव घेऊन हे आले असतील, अशी भाजपा नेत्यांची भावना होती. मात्र देसाई यांनी सुरुवातीलाच 119 जागांच्यावर जागा देणो अशक्य असल्याचा सूर लावला. बैठकीनंतर शिवसेनेचे नेते निघून गेल्यावर भाजपाच्या गोटात निराशेचाच सूर होता.
 
प्रस्ताव आला की नाही?
रात्री महापौर बंगल्यावर उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, अनिल देसाई वगैरे मंडळींची चर्चा झाली. तेथून बाहेर पडताना उद्धव ठाकरे यांनी आपण भाजपाला नवीन प्रस्ताव दिल्याचे वाहिन्यांना सांगितले. त्यामुळे भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना फोन करून आपल्याकडे कुठलाही नवा प्रस्ताव आलेला नाही हे तात्काळ स्पष्ट केले.  
 
155-126  
चा फॉम्यरुला अमान्य
शनिवार सकाकाळपासून वेगवेळे प्रस्ताव बाहेर येत होते. शिवसेनेच्या गोटातून सांगितले गेले की, शिवसेना 155 तर भाजपा 126 जागा लढवेल. याखेरीज स्वाभिमानला 7 जागा देण्यात येतील. रिपब्लिकन, राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांनी आमच्या जागा घ्या पण युती टिकवा, असे आवाहन केले असल्याने त्यांना वेगळ्य़ा जागा सोडण्याची गरज नाही. भाजपाच्या नेत्यांची कोअर कमिटीची बैठक सकाळपासून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर सुरु होती. 
 
आज सेनेचा अंतिम फैसला : शिवसेनेने उद्या दुपारी रंगशारदा सभागृहात राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे तर भाजपाच्या केंद्रीय निवड मंडळाची बैठक दिल्लीत आहे. त्यापूर्वी हा तिढा सुटणार का, याविषयी उत्सुकता आहे.
 
रिपाइंला हव्यात दहा जागा
दुपारी वरील जागांचा प्रस्ताव घेऊन सुभाष देसाई हे वरळीला खासदार पूनम महाजन यांच्या निवासस्थानी ओम माथूर व देवेंद्र फडणवीस यांना भेटले. रिपाइंला जागा नकोत का? अशी विचारणा भाजपाच्या नेत्यांनी आठवले यांच्याकडे केल्यावर दहा जागांवर दावा करणारे पत्र घेऊन अविनाश महातेकर यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारपासून पुन्हा भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सुरु झाली. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांची पुन्हा बैठक होणार असा दावा भाजपा करीत असली तरी त्याबाबत अनिश्चितता होती.