शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘त्या’ स्टेशन मास्तरला ४ वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: May 23, 2016 04:36 IST

सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा

औरंगाबाद : सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (रेल्वे) ए.सी. डोईफोडे यांनी एकूण चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच तत्कालीन पॉइंटस्मन विनायक नागरगोजे याला दोन वर्षे कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.एक मालगाडी ३ जानेवारी २००३ रोजी मध्यरात्री सिग्नल मिळाल्याने घाटनांदूर रेल्वेस्टेशनच्या ‘मेन लाईन’वर उभी होती. पहाटे १.३० वाजता ‘सिकंदराबाद-मनमाड’ एक्स्प्रेस लातूर रोडहून घाटनांदूर मार्गे परळीकडे रवाना होणार होती. ही रेल्वे घाटनांदूरला आल्यानंतर हिरवे ‘आऊटर’ आणि ‘होम’ सिग्नल देऊन ही रेल्वे ‘मेन लाईन’वर जाण्याचा संकेत देण्यात आला. त्यानुसार ही रेल्वे मेन लाईनवर रवाना झाली. या रेल्वेने होम सिग्नल पार केल्यानंतर मेन लाईनवर मालगाडी उभी असल्याचे रेल्वेचालकाला दिसले. म्हणून रेल्वे थांबविण्यासाठी चालकाने ‘इमर्जन्सी ब्रेक’ (आपत्कालीन) लावले; परंतु दुर्र्दैवाने ही रेल्वे मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. परिणामी रेल्वेचे इंजिन, ए.सी. कोच, एक जनरल बोगी रुळाखाली घसरली. तसेच ७४ लोक गंभीर जखमी झाले होते आणि २० लोक मरण पावले होते.परळीच्या रेल्वे पोलिसांनी सदर अपघाताचा तपास करून स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मनविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीअंती न्यायालयाने स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मन यांना दोषी ठरवले आणि स्टेशन मास्तर वर्मा याला भा.दं.वि. कलम ३०४ (अ) खाली दोन वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. (प्रतिनिधी)