शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्टेशन मास्तरला ४ वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: May 23, 2016 04:36 IST

सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा

औरंगाबाद : सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (रेल्वे) ए.सी. डोईफोडे यांनी एकूण चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच तत्कालीन पॉइंटस्मन विनायक नागरगोजे याला दोन वर्षे कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.एक मालगाडी ३ जानेवारी २००३ रोजी मध्यरात्री सिग्नल मिळाल्याने घाटनांदूर रेल्वेस्टेशनच्या ‘मेन लाईन’वर उभी होती. पहाटे १.३० वाजता ‘सिकंदराबाद-मनमाड’ एक्स्प्रेस लातूर रोडहून घाटनांदूर मार्गे परळीकडे रवाना होणार होती. ही रेल्वे घाटनांदूरला आल्यानंतर हिरवे ‘आऊटर’ आणि ‘होम’ सिग्नल देऊन ही रेल्वे ‘मेन लाईन’वर जाण्याचा संकेत देण्यात आला. त्यानुसार ही रेल्वे मेन लाईनवर रवाना झाली. या रेल्वेने होम सिग्नल पार केल्यानंतर मेन लाईनवर मालगाडी उभी असल्याचे रेल्वेचालकाला दिसले. म्हणून रेल्वे थांबविण्यासाठी चालकाने ‘इमर्जन्सी ब्रेक’ (आपत्कालीन) लावले; परंतु दुर्र्दैवाने ही रेल्वे मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. परिणामी रेल्वेचे इंजिन, ए.सी. कोच, एक जनरल बोगी रुळाखाली घसरली. तसेच ७४ लोक गंभीर जखमी झाले होते आणि २० लोक मरण पावले होते.परळीच्या रेल्वे पोलिसांनी सदर अपघाताचा तपास करून स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मनविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीअंती न्यायालयाने स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मन यांना दोषी ठरवले आणि स्टेशन मास्तर वर्मा याला भा.दं.वि. कलम ३०४ (अ) खाली दोन वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. (प्रतिनिधी)