शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘त्या’ स्टेशन मास्तरला ४ वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: May 23, 2016 04:36 IST

सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा

औरंगाबाद : सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (रेल्वे) ए.सी. डोईफोडे यांनी एकूण चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच तत्कालीन पॉइंटस्मन विनायक नागरगोजे याला दोन वर्षे कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.एक मालगाडी ३ जानेवारी २००३ रोजी मध्यरात्री सिग्नल मिळाल्याने घाटनांदूर रेल्वेस्टेशनच्या ‘मेन लाईन’वर उभी होती. पहाटे १.३० वाजता ‘सिकंदराबाद-मनमाड’ एक्स्प्रेस लातूर रोडहून घाटनांदूर मार्गे परळीकडे रवाना होणार होती. ही रेल्वे घाटनांदूरला आल्यानंतर हिरवे ‘आऊटर’ आणि ‘होम’ सिग्नल देऊन ही रेल्वे ‘मेन लाईन’वर जाण्याचा संकेत देण्यात आला. त्यानुसार ही रेल्वे मेन लाईनवर रवाना झाली. या रेल्वेने होम सिग्नल पार केल्यानंतर मेन लाईनवर मालगाडी उभी असल्याचे रेल्वेचालकाला दिसले. म्हणून रेल्वे थांबविण्यासाठी चालकाने ‘इमर्जन्सी ब्रेक’ (आपत्कालीन) लावले; परंतु दुर्र्दैवाने ही रेल्वे मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. परिणामी रेल्वेचे इंजिन, ए.सी. कोच, एक जनरल बोगी रुळाखाली घसरली. तसेच ७४ लोक गंभीर जखमी झाले होते आणि २० लोक मरण पावले होते.परळीच्या रेल्वे पोलिसांनी सदर अपघाताचा तपास करून स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मनविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीअंती न्यायालयाने स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मन यांना दोषी ठरवले आणि स्टेशन मास्तर वर्मा याला भा.दं.वि. कलम ३०४ (अ) खाली दोन वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. (प्रतिनिधी)