शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
3
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
4
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
5
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
6
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
7
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
8
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
9
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
10
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
11
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
12
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
13
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
14
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
15
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
16
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
17
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
18
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
19
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
20
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...

...तर राज्याचे १०० कोटींचे नुकसान

By admin | Updated: April 10, 2016 03:18 IST

‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेचे मुंबई, नागपूर व पुण्यात होणारे १८ सामने दुष्काळ आाणि पाणीटंचाईच्या कारणावरून राज्याबाहेर हलविले तर महाराष्ट्र सरकारचे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई : ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेचे मुंबई, नागपूर व पुण्यात होणारे १८ सामने दुष्काळ आाणि पाणीटंचाईच्या कारणावरून राज्याबाहेर हलविले तर महाराष्ट्र सरकारचे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान होईल. हा महसूल बुडविण्याऐवजी सरकार या पैशाचा दुष्काळग्रस्त भागांत मदत कार्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.‘आयपीएल सामने राज्याबाहेर गेले तरी चालेल. पण या सामन्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी पुरविले जाणार नाही,’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतली होती. त्यांच्याच पक्षाचे खासदार असलेले अनुराग ठाकूर एका कार्यक्रमासाठी नवी मुंबईत आले असता त्यांना विचारता त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन करून पाणी आणि १०० कोटी यापैकी काय हवे याचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे, असे अप्रत्यक्षपणे सुचविले.या स्पर्धेमुळे देशातील अनेक उदयोन्मुख खेळाडूंना नावारूपाला येण्याची संधी मिळते. शिवाय यामुळे पर्यटनासही मदत होते, असेही ठाकूर यांचे म्हणणे होते. याविषयी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने पहिल्या सामन्यास हिरवा कंदील दिला असून, राज्यातील उर्वरित सामने अन्यत्र हलवायचे की नाही हे मंडळाच्या विवेकावर सोडले आहे. पुढील सुनावणी १२ एप्रिल रोजी होईल तेव्हा क्रिकेट मंडळ व स्पर्धेतील संघ आपली भूमिका न्यायालयापुढे मांडतील. (विशेष प्रतिनिधी)गावे दत्तक घेण्याचा विचारठाकूर म्हणाले की, राज्यातील दुष्काळी परिस्थितीची मंडळासही खूप चिंता वाटते व म्हणूनच आम्ही सामन्यांच्या ठिकाणी मैदाने व खेळपट्ट्यांसाठी पिण्याचे पाणी वापरणार नाही.स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांसह मंडळ काही दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेण्याच्या विचारात आहे व याखेरीज दुष्काळग्रस्तांसाठी आणखी काय करता येईल, हे तपासून पाहण्यास मंडळाने संघ व्यवस्थापनांना सांगितले आहे, असेही ठाकूर म्हणाले.