शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे कृषी पर्यटन धोरण लवकरच- जयकुमार रावल

By admin | Updated: May 16, 2017 20:43 IST

कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याला जोडव्यवसायाची आवश्यकता आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याला जोडव्यवसायाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाला मोठा वाव असून, त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण तयार केले आहे. हे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.दहाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय (पदूम) मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, अ‍ॅग्री टुरीजमचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे, गोवर्धन इको व्हीलेजचे निरज कपूर, कृषी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेले भगवान तावरे, माधव सानप, अभिजित फाळके आदी मान्यवर उपस्थित होते. एमटीडीसी आणि अ‍ॅग्री टुरीजम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मंत्री रावल म्हणाले की, आपले राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. याशिवाय राज्याला वेगळी अशी ऐतिहासीक, सांस्कृतिक ओळख आहे. राज्यात शहरीकरण हे साधारण ५० टक्क्यांपर्यत वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण जीवनशैली, कृषी संस्कृती यांचे आकर्षण वाढले आहे. या संधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. राज्य शासनानेही कृषी पर्यटनाला चालना देण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने समग्र असे कृषी पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. येत्या २३ मे रोजी यासंदर्भात वित्त आणि उर्जा मंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. धोरणाचा मसुदा तयार झाला असून त्यास मान्यता घेऊन लवकरच हे धोरण जाहीर करण्यात येईल.  कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक तरतुदी या धोरणात असतील, असे त्यांनी सांगितले.कृषी पर्यटनासाठी एमटीडीसीत स्वतंत्र अधिकारीकृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी व यासंदर्भातील योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात एक स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात येईल, असेही मंत्री रावल यांनी यावेळी जाहीर केले. राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे प्रमाण सर्वाधिक असून देशाच्या विविध भागातूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. एमटीडीसीमार्फत सुरु करण्यात आलेल्या महाभ्रमण योजनेतून अमरावती जिल्ह्यातील डीअर पार्क, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रोकोडाईल पार्क यांसारखे उपक्रम यशस्वी होत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पदूम मंत्री जानकर यावेळी म्हणाले की, कृषी विकासाला चालना देण्यासाठी शासनाने पदूम विभागावार विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी या क्षेत्रातही पदूम विभाग महत्वपूर्ण योगदान देईल. पर्यटन विभागामार्फत लवकरच जाहीर होणाऱ्या कृषी पर्यटन धोरणात पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसायासंदर्भातील तरतुदींचाही समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विविध पुरस्कारांचे वितरणदरम्यान, कृषी पर्यटनात विशेष कार्य करणाऱ्या विविध संस्था, व्यक्ती यांचा या परिषदेच्या समारोप समारंभात विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पर्यटन मंत्री श्री. रावल व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. चंद्रपूर येथील एक मोकळा श्वास अ‍ॅग्रीटुरीजम सेंटरचे सुहास अशेकर, थेऊर (जि. पुणे) येथील कल्पतरु अ‍ॅग्रीटुरीजम सेंटरचे प्रतिक कंद, मोराची चिंचोली (जि. अहमदनगर) येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंदराव थोपटे, औरंगाबाद येथील सृष्टी अ‍ॅग्रीटुरीजम सेंटरचे किरण सानप व प्रतिभा सानप, अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथील अदरना अ‍ॅग्रीटुरीजम सेंटरचे एन. रामकृष्णा, पालघर येथील गोवर्धन इको व्हीलेजचे नीरज कपूर यांना यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.समारोप समारंभात बोलताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, शेती व्यवसायाला उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधणे गरजेचे आहेत. यादृष्टीने कृषी पर्यटन हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्याला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.