शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

राज्यमंत्र्यांच्या विधानावरून गदारोळ

By admin | Updated: April 8, 2016 02:46 IST

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विरोधी सदस्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यमंत्र्यांच्या विधानामुळे संतप्त

मुंबई : सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विरोधी सदस्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यमंत्र्यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी माफीनाम्याची मागणी लावून धरल्याने तब्बल सहा वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विरोधक शांत झाले.गुरुवारी दुपारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राष्ट्रवादीचे सदस्य अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील खंडूबाबा माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली. यावर बोलताना राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, मुलींची शाळेतून गळती होऊ नये यासाठी महिना साठप्रमाणे दहा महिन्यांसाठी ६०० रुपयांचे अनुदान दिले जाते. संबंधित शाळेतील काही मुलींनी शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार केली होती. २००९ ते २०१३ या काळातील हा प्रकार आहे. याचा तपास केला असता केवळ ९०० रुपयांचा हा प्रकार असल्याचे आढळून आले. ९०० रुपये संस्थेकडेच पडून होते आणि त्यात कसलीच अफरातफर झाली नसल्याचे स्पष्ट केले. एकीकडे मागासवर्गीय शाळा चालत नसल्याची तक्रार विरोधकांकडून होते, तर दुसरीकडे चांगल्या शाळेला मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु सरकार असे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर विरोधी बाकावर बसलेल्या काही सदस्यांनी आव्हानात्मक टिप्पणी केली. त्यावर राज्यमंत्र्यांनी थेट इशारा देत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या विधानानंतर विरोधी बाकांवरून विशेषत: राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आली. त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज तहकूब केले.कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आजचा दिवस सभागृहासाठी काळा दिवस असल्याचे म्हटले. सभागृहाची प्रतिष्ठा आणि शिष्टाचार जपणे आवश्यक आहे. राज्यमंत्र्यांचे विधान गंभीर आहे, हे असेच चालू राहिले तर उद्या विरोधी सदस्यांना प्रश्न विचारणेही अशक्य होईल.>सभापती नाईक-निंबाळकर यांनीही राज्यमंत्र्यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. दिलीप कांबळे यांना मी चांगला ओळखतो. ते आज इतके भावनिक का झाले आणि त्यांनी हे विधान कसे केले याबद्दल मलाही आश्चर्य वाटते. त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करावी, असे सभापती म्हणाले.शेवटी सायंकाळी चार वाजता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. असा प्रकार घडायला नको होता. हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. दोन्ही बाजूंकडील सदस्यांनी संयम बाळगायला हवा. भावनेच्या भरात, उद्वेगामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. सर्व सदस्यांना आणि सहकारी मंत्र्यांना याबाबत दक्षता घेण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. खडसे यांच्या दिलगिरीनंतर सभागृहाच्या पुढील कामकाजास सुरुवात झाली.