शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

राज्यातील कुलगुरूपदाचे निकष बदलणार

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

कृषी विद्यापीठ : संचालकपदाचा अनुभव पाचऐवजी तीन वर्षे करण्याच्या हालचाली

शिवाजी गोरे- दापोली -राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील प्राध्यापक व त्यावरील पदे गेली अनेक वर्षे भरली नसल्याने कृषी विद्यापीठ निवड समितीला कुलगुरूपदासाठी राज्यातून एकही पात्र उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. कुलगुरूपदासाठी लागणाऱ्या संचालकपदाच्या पाच वर्षांच्या अनुभवाचा निकष बदलून आता तो तीन वर्षे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.सरकारने गेली पाच वर्षे प्राध्यापक व त्यावरील पदांची भरती केलेली नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. २००८ पासून कृषी विद्यापीठातील प्राध्यापक व त्यावरील संचालकपदांची भरती प्रक्रिया न झाल्याने शास्त्रज्ञांवर अन्याय झाला आहे. ही पदे भरली असती तर कृषी विद्यापीठांना पूर्ण क्षमतेने काम करणारे संचालक मिळाले असते. पाच वर्षे ही प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे पात्रता असून सुद्धा लोकांना संधी मिळालेली नाही. कुलगुरूपदासाठी संचालकपदाचा पाच वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. मात्र, भरतीच न झाल्यामुळे सध्याच्या घडीला कोणीही हा निकष पूर्ण करू शकत नाही.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुपद डिसेंबर २0१४मध्ये रिक्त होणार होते. त्यामुळे आॅक्टोबर २०१४ मध्ये डॉ. आयप्पन यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर कुलगुरुपदासाठी अर्ज मागवण्यात आले. नवीन राज्यपालांनी या भरतीला हिरवा कंदील दाखविला. विहित नमुन्यात व मुदतीत आलेल्या अर्जांची छाननी झाली. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दोन महिने निवड समितीने या भरती प्रक्रियेचे काम पाहिले; परंतु पाच वर्षे संचालकपदाचा अनुभव असणारा योग्य उमेदवार मिळाला नाही. कुलगुरूपदाची वयोमर्यादा ६५ वर्ष आहे. निवृत्त झालेल्या काही संचालकांना पाच वर्षांचा अनुभव आहे. मात्र, त्यांच्याकडे कुलगुरूपद सोपवले तर फारच थोड्या काळासाठी या पदावर काम करू शकतील. त्यामुळे त्यांनाही डावलण्यात येऊन दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला. १९ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. किसन लवांडे कुलगुरुपदावरून निवृत्त झाले. त्याच दिवशी नवीन कुलगुरुंनी पदभार स्वीकारणे अपेक्षित होते; परंतु पात्र उमेदवार न मिळाल्याने दापोलीचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. व्यंकटेश्वर यांच्याकडे दापोलीचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला. दोन महिने दापोली कृषी विद्यापीठाचा कार्यभार अतिरिक्त कुलगुरू मराठवाड्यातून हाकत आहेत.राज्यातील कृषी विद्यापीठाची संचालकपदे न भरल्याने ‘आयसीआर’च्या एखाद्या संशोधन केंद्रावर काम करणाऱ्या व्यक्तीला कुलगुरुपदी संधी मिळू शकते; परंतु राज्यातील कृषी विद्यापीठात प्राध्यापक, विभागप्रमुख, प्राचार्य या पदावर काम करणाऱ्याला संधी मिळत नाही. शिक्षण, संशोधन, विस्तार या तिन्ही स्तरांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना संधी मिळत नाही. त्यामुळे कुलगुरुपदाचे निकष बदलण्याची गरज असल्याचे वारंवार पुढे येत आहे.राज्यपालांनी सूचना मागवल्याडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी पात्र उमेदवार न मिळाल्याने राज्यपालांनी चारही कृषी विद्यापीठांकडून सूचना मागवल्या असून, या सूचनांचा अभ्यासपूर्ण विचार करून कुलगुरू निवडीचे निकष बदलण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. संचालकपदाचा पाच वर्षांचा अनुभव कमी करून तो तीन वर्षे करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील मराठी शास्त्रज्ञांना कुलगुरूपदाची संधी मिळणार आहे. लवकरच त्याबाबतचा अध्यादेश काढला जाईल, असे अपेक्षित आहे.