शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

राज्यात तलाठ्यांची तीन हजार पदे भरणार

By admin | Updated: April 30, 2017 01:41 IST

राज्यात तलाठ्यांची तीन हजार आणि मंडळ अधिकाऱ्यांची सुमारे ५०० पदे टप्प्याटप्प्याने भरण्याच्या महसूल विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

- यदु जोशी,  मुंबई

राज्यात तलाठ्यांची तीन हजार आणि मंडळ अधिकाऱ्यांची सुमारे ५०० पदे टप्प्याटप्प्याने भरण्याच्या महसूल विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक २०० कोटी रुपयांचा बोजा पडणार असला तरी महसुली कामांना गती मिळणार आहे. या बाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येईल, असे सूत्रांनी सांगितले. वर्ग कच्या श्रेणीत येणाऱ्या तलाठ्यांची सध्या राज्यातील संख्या १२ हजार ६३७ इतकी आहे. महसूल विभागाबरोबरच अनेक विभागांची कामे त्यांना करावी लागतात. आजमितीस सरासरी सहा गावांमागे एक तलाठी अशी संख्या आहे. त्यामुळे कामांचा प्रचंड ताण त्यांच्यावर येतो. पदे वाढविण्यासंदर्भात नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी २०१४ मध्ये नेमलेल्या समितीने आॅगस्ट २०१४ मध्ये आपला अहवाल दिला होता आणि ३१०० नवीन पदे निर्माण करण्याची महत्त्वाची शिफारस केली होती. त्या अहवालावरील धूळ आता बाजूला सारत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन हजार पदे भरण्यास मान्यता दिली आहे.महसूलवाढीचे वचन महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या तिजोरीवर या निर्णयाने आर्थिक बोजा पडणार असला तरी पदे वाढल्याने विविध प्रकारची करवसुली करण्यास गती मिळेल आणि शासनाचे उत्पन्न वर्षाकाठी सुमारे ४०० कोटी रुपयांनी वाढेल.